वर्धा: सध्या अधिक मास सुरू असून जावई बापूंचा भाव चांगलाच वधारला आहे. हा दानाचा महिना म्हणून आपापल्या परीने दान केले जात आहेत. यात सर्वाधिक मान जावयास दिला जातो. हिंदू धर्मात लेकी जावयास लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणून मान्यता आहे. या अधिक मासात त्यांना घरी बोलावून यथोचित सत्कार केला जातो.

जावयास कपडेलत्ते, भेटवस्तू, दागिने दिले जातात. पण खाद्यात अनारसे या पारंपरिक पदार्थाचे विशेष महत्व असते. चांदी किंवा तांब्याच्या ताटात तुपात तळलले तेहत्तीस अनारसे देतात. त्याचे भाव चांगलेच वधारले. सध्या ५०० रुपये किलोने ते विकले जात आहेत. तुपाचे ९०० रुपये किलो आहेत. हा पदार्थ सुग्रणीचा कस लावणारा मानला जातो.

Dried Fish, Dried Fish Prices Surge Due, Decreased Arrivals, High Demand,
सुक्या मासळीच्या दरात वाढ, कोळंबीचे सोडे १३०० रुपये किलोवर
Akshaya Tritiya, gold, price,
अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दरात उसळी, ‘हे’ आहे आजचे दर
bandra, Mumbai, Robbery, robbery plot in bandra, bandra east, Suspects with pistols, pistols in bandra, crime in Mumbai,
वांद्रे पूर्व येथून पिस्तुलासह चौघांना अटक
Mumbai Municipal Parks department, bmc parks department Provide Drinking Water to birds, bmc parks department, Provide Drinking Water to birds, Ease Heatwave Hardships, heatwave in Mumbai, heatwave, heat in Mumbai, summer, summer in Mumbai, summer news, marathi news,
मुंबई : वाढत्या उकाड्यात पक्षांना थंडावा देण्याचा पालिकेचा प्रयत्न, ५०० उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय
leopard fell into well for water, leopard water washim,
जंगलात पाणी मिळेना, वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला; तहान भागविण्यासाठी…
two Children Drown While Swimming, Surya River, palghar taluka, One Rescued, two dead Body Found , two Children Drown in Surya River, palghar news, Drown news,
सूर्या नदीत दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
Nandurbar, Bribery Arrest, Systemic Corruption, Thane Anti Bribery Department, Nandurbar Bribery Arrest, Nawapur Border Check Point, Nawapur Border Check Point Bribery case, marathi news,
नंदुरबार : गोष्ट ५० रुपयाच्या लाचेची…
environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा

हेही वाचा… बुलढाणा : जिल्हा परिषदेत आंदोलन करणाऱ्या शाळा समिती अध्यक्षासह ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल, शिक्षणाधिकाऱ्यांची तक्रार

चार दिवस तांदूळ पीठ भिजवून त्याचे नंतर लाटन व मग तळण असा व्याप असतो. जाळीदार अनारसे जिला जमते, ती खरी सुग्रन अशी मान्यता आहे. ते आजकाल शक्य होत नसल्याने कॅटरर कडून विकत घेतले जात आहेत. कारण त्याशिवाय जावयाचा मान पूर्ण होत नाही, अशी प्रथा आहे. हा महागडा पदार्थ करणे किंवा विकत आणणे शक्य नसल्यास मोठे बत्ताशे ताटात ठेवले जातात आणि जावयाचे लाड पुरवले जातात.