वर्धा : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायमच आहे. दोन दिवसांपूर्वी दोन अपघात झाले. त्यात तिघांचा बळी गेला होता. आज एक वाजता टोल नाक्याजवळ ट्रक रस्त्याखाली उतरला.

हा ट्रक वेगात होता. नाक्याजवळ येत असताना अचानक वेग कमी करण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याचे सांगितल्या जाते. ट्रक उलटताच त्यातील बियरचे पूर्ण डब्बे फुटले. काचांचा खच पडला. घटना कळताच महामार्ग व सावंगी पोलिसांची चमू घटनास्थळी पोहोचली.

हेही वाचा – नागपूर : ब्रिटिश येण्यापूर्वी भारतात सर्वत्र साक्षरता होती; लेखिका साहना सिंह यांचा अजब दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा ट्रक अमरावती येथून नागपूरला चालला होता. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. अपघात झाल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. ती आता पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आले आहे.