रामकथाकार  धीरेन्द्र कृष्ण शास्त्री महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिति यांच्यातील वाद विकोपाला जात आहे. हिंमत असेल तर श्याम मानव यांनी अन्य धर्मीयांची पोलखोल करून दाखवावी,असे  आव्हान  भाजपचे आमदार मोहन मते यांनी दिले आहे. नागपुरात बाबांची रामकथा आयोजित करण्यात आली होती. त्यातील ‘दिव्य दरबार’ वर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला होता.

हेही वाचा >>> दावोस परिषदेतील गुंतवणुकीवरून वाद : राज्यातील कंपन्यांशीच करार केल्याचा विरोधकांचा आरोप

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. तसेच धीरेन्द्र कृष्ण शास्त्री महाराजाला चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते.  यावर याबाबत रामकथा आयोजन समिती संबंधित दक्षिण नागपूरचे भाजपच आमदार  मोहन मते यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व संघटनेचे प्रमुख  श्याम मानव यांना आव्हान दिले आहे. मानव यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी अन्य धर्मांचीही पोलखोल करावी.फक्त हिंदू धर्म,सनातन धर्म आणि साधू-संतांना बदनाम करण्याची मोहीम श्याम मानव यांनी सुरू केली आहे. फक्त  प्रसिद्धीसाठी हे सर्व सुरू आहे,असे मते यांचे म्हणने आहे.