शहरात परवानगी नसताना धावणाऱ्या खासगी कंपन्यांच्या दुचाकी टॅक्सीविरुद्ध रविवारी याच कंपन्यांच्या कार टॅक्सी चालकांनी संविधान चौकात निदर्शने केली.ॲपआधारित टॅक्सीचालक वर्कर्स वेल्फेयर एसोसिएशनच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. सोमवारी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

हेही वाचा – यवतमाळ : …अन् लोकांच्या मनातील ‘आमदार’ आता कधीच निवडणूक लढणार नाही !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार टॅक्सी चालकांच्या संघटनेचे दीपक साने यांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी कंपनीच्या दुचाकी टॅक्सीसेवेमुळे याच कंपन्यांच्या कार टॅक्सी चालकांना प्रवासी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. पूर्वी एका प्रवाशासाठी कार टॅक्सी मागवली जात होती. आता टू व्हीलर टैक्सीमुळे ही गरज संपली. दुचाकी कारटॅक्सीला आरटीओची परवानगी नाही. तरीही बेकायदेशीरपणे शहरात हजारों टू व्हीलर टैक्सी धावत आहेत. आरटीओकडे तक्रार केल्यावर नाममात्र कारवाई केली जाते, कारटॅक्सी चालक-मालकांना कंपन्यांकडून कमीशन मिळत नसल्याने ते त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी त्यांना वाहनतळ उपलब्ध केले नसल्याने आरटीओकडून कारवाई केली जात आहे,आता टूव्हीलर टॅक्सीमुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत आल्याने हे आंदोलन करण्यात आले,असे साने यांनी निवेदनात स्पष्ट केले.