नागपूर: राज्यघटना लिहिली जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भारताला हिंदू राष्ट्र करण्याबाबत दबाव टाकला जात होता. परंतु, त्यांनी या दबावाला भीक घातली नाही, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (सीपीआय) सरचिटणीस व माजी खासदार डी. राजा यांनी केले.

कॉम्रेड एच.एल. परवाना मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने ‘परवाना ओरेशन-२०२३’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सी.एच. वेंकटचेलम, रामकुमार गुप्ता, सुरेश बोभाटे, डी.एस. बुचे, जे.एस. गुरव, राम नेरकर, बी.एन.जे. शर्मा उपस्थित होते.

History of Darbar Hall, Rashtrapati Bhavan
विश्लेषण: राष्ट्रपती भवनातील हॉल झाले मंडप; नामांतर का?  कशासाठी?
RSS News
RSS News: सरकारच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उत्तर, “आपल्या राजकीय स्वार्थासाठी…”
sanjay raut replied to amit shah
“आम्ही तुमच्यासारखे ‘जिना फॅन्स क्लब’चे सदस्य…”, अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर!
pm narendra modi inaugurates development projects worth over rs 29000 crore in mumbai
महाराष्ट्र जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र; पंतप्रधानांचा विश्वास; २९ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण;
ashok chavan keep bjp away from program on birth anniversary of shankarao chavan
शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम; भाजपला दूर ठेवण्याची दक्षता!
Vice President question on P Chidambaram criticism about Parliament print politics news
आम्ही संसदेत ‘पार्ट टाइमर’ आहोत काय? चिदम्बरम यांच्या टीकेवर उपराष्ट्रपतींचा सवाल
Rohit Pawar Ashish Shelar Video
Video: रोहित पवारांसाठी भाजपाचे आशिष शेलार रोहित शर्माच्या मागे धावले; वानखेडेवर काय घडलं?
150th birth anniversary of Chhatrapati Shahu Maharaj by Dr Babasaheb Ambedkar Research and Training Institute BARTI
सचिवांच्या नातेवाईकाला पावणेदोन कोटींचे कंत्राट! शाहू महाराज जयंतीचा नियोजित कार्यक्रम असतानाही तातडीची निविदा

डी. राजा म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून संबोधण्याची मागणी अमान्य केली होती. तसेच त्यांनी अध्यक्षीय लोकशाही देखील नाकारली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशाप्रकारची लोकशाही म्हणजे हुकूमशाहीला चालना होती. आंबेडकरांमुळेच आज आपल्या देशात बहुपक्षीय लोकशाही, संसदीय लोकशाही आहे.

हेही वाचा… नागपूर विद्यापीठाला शंभर वर्षांचा इतिहास, १९५० ला आले होते पहिले राष्ट्रपती

उद्योगपती गौतम अदानी आणि देशातील प्रत्येक नागरिकाच्या मतदानाचे एकच मूल्य आहे. पण, येथील नागरिक आणि गौतम अदानी समान आहोत, असे मात्र आपण म्हणू शकत नाही. एवढी आर्थिक, सामाजिक दरी या देशात निर्माण झाली आहे. या विषमतेला खतपाणी घालण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. करीत राज्यघटना, लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला आगामी निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन डी. राजा यांनी केले.