वाशीम: जिल्ह्यातील ८५ वीज ग्राहकांची वीज जोडणी ऑनलाईन प्रणालीमध्ये खंडित केल्याची नोंद असताना प्रत्यक्षात मात्र वीज जोडणी सुरू असल्याची गंभीर बाब विशेष तपासणी मोहिमेत वरिष्ठांच्या निदर्शनात आली. कोट्यवधी रुपयांची थकबाकी थकल्यामुळे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>नागपूर : तर पुन्हा फडणवीसांच्या निवासस्थानापुढे हनुमान चालिसा पठण?

Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या निर्देशानुसार कायमस्वरूपी खंडित केलेल्या वीज ग्राहकांची ७ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान तपासणी मोहीम राबवण्यात आली. ऑनलाईन प्रणालीवर खंडित केल्याची नोंद होती. मात्र, प्रत्यक्षात त्या ग्राहकांकडे विद्युत पुरवठा सुरू होता ही गंभीर बाब निदर्शनास आल्यामुळे व त्यांच्याकडे मोठी थकबाकी असल्याचेही निदर्शनास आले. हा गंभीर प्रकार महावितरणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असल्याचा ठपका ठेवत महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांना निलंबित करण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.