नागपूर : महावितरणने गेल्या दहा महिन्यात प्रतीक्षा यादीतील एक लाखावर शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणी दिली आहे. महावितरणने १ एप्रिल २०२२ ते ३० जानेवारी २०२३ पर्यंतच्या काळात जोडणीसाठी अर्ज केलेल्या प्रतीक्षायादीतील १ लाख ४ हजार ७०९ शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली. त्यापैकी सुमारे ५४ हजार जोडण्या गेल्या तीन महिन्यांत दिल्या. कृषी पंपासाठी वीज जोडणीकरिता अर्ज करून शुल्क भरल्यानंतर जोडणी मिळण्यासाठी काही वेळ लागतो. याला ‘पेड पेंडिंग’म्हणतात.

हेही वाचा >>> धक्कादायक! अटक न करण्यासाठी मागितली लाच

dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
BJP spent 38 crores in online advertisements in three months
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च; ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

ऊर्जा खात्याची सूत्रे स्वीकारल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवण्याची सूचना महावितरणला केली. त्यानुसार महावितरणने गेल्या सहा महिन्यात विशेष नियोजन करून वीज जोडणी देणे सुरू केले. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ३१ मार्च २०२३ पर्यंत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी जोडण्या देण्यात येईल, असे महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.