वाशिम: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात लढा तीव्र केला आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठेगांव येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण करून नेत्यांना गाव बंदी घातली आहे.

रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील ग्रामस्थांनी २५ ऑक्टोंबर रोजी कॅन्डल मार्च काढून एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा देऊन आरक्षणाची मागणी केली तर आज २६ ऑक्टोंबर पासून गावातील बस स्थानक येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. राज्यात सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर सभा घेऊन आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.

हेही वाचा… “हामुन” चक्रीवादळ बनले धोकादायक! “या” पाच राज्यांवर आज होणार परिणाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक गावात नेत्यांना प्रवेश बंदी घातली जात आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील मोठेगाव येथे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आधी कॅण्डल मार्च काढून तर आता साखळी उपोषण सुरू केले आहे.