अनिल कांबळे, लोकसत्ता  

नागपूर : महाराष्ट्र पोलीस दलात १७ हजार ४७१ पदांसाठी भरती होत आहे. १७ लाख ७६ हजार युवक-युवतींनी या भरतीसाठी अर्ज केला आहे. यामध्ये अभियंते, डॉक्टर, बी-टेक आणि एमबीएची पदवी मिळवणारेसुद्धा आहेत. उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल ४१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीतून हा तपशील समोर आला आहे.     

supreme court
‘नीट’चा शहरनिहाय निकाल; लवकरच समुपदेशनाचे वेळापत्रक; सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
The Central Public Service Commission itself has admitted that Pooja Khedkar has cheated
पूजा खेडकरांकडून फसवणूक; केंद्रीय लोकसेवा आयोगाचीच कबुली; नियुक्ती रद्द होण्याची चिन्हे
Chandrakant Patil, Chandrakant Patil minister,
मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या शिक्षण संस्थांची मान्यता रद्द, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा
centre forms panel to probe row involving probationary ias officer pooja khedkar
पूजा खेडकर यांची केंद्राकडून चौकशी; एकसदस्यीय समितीची स्थापना, राज्याकडूनही अहवाल पाठविण्याची तयारी
mumbai high court
विशेष मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्याचे काय झाले? उच्च न्यायालयाची केंद्र-राज्य सरकारला विचारणा
Barty awarded contracts to institutes with no experience in JEE and NEET exam coaching Nagpur
‘जेईई’,‘नीट’चा अनुभव नसणाऱ्या संस्थांना विनानिविदा कंत्राट; ‘बार्टी’च्या संस्था निवडीच्या…
State Level II CET for BMS BMS BBA BCA Admission
प्रवेशाची पायरी: बीएमएस/ बीएमएस/ बीबीए/ बीसीए प्रवेशासाठी राज्यस्तरीय द्वितीय सीईटी
nagpur, nagpur news, 7000 mahadbt Post Matric Scholarship Applications Pending, mahadbt Post Matric Scholarship Applications, Scholarship Applications Pending by Colleges in nagpur,
शिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालय जबाबदार, काय आहेत शासनाच्या सूचना

५ मार्चपासून पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. १५ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरातून १७ लाख ७६ हजार युवक- युवतींचे  अर्ज प्राप्त झाले. त्यात पदवीधर आणि पदव्युत्तपर्यंत शिक्षण घेतलेल्यांची संख्या ४१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यात अभियंते, डॉक्टर, एमबीए, एलएलबी, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षितांचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे.  वाढती बेरोजगारी, वाढता उच्चशिक्षितांचा टक्का आणि शासकीय नोकरीच्या आकर्षणामुळे हा टक्का वाढला आहे.

हेही वाचा >>> उद्योग, रोजगाराच्या प्रश्नांमुळे पीछेहाट; उपराजधानीत साधनसंपत्ती असूनही विकास संथगतीने

भरती प्रक्रिया मेअखेर  

१५ एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती. मेअखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडयापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून ऑक्टोबरअखेर निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता  आहे.

अर्जशुल्कात दिलासा  

शासकीय नोकरीसाठीच्या शुल्काची रक्कम जवळपास एक हजार रुपये  असते. मात्र, पोलीस विभागाने थोडा दिलासा दिला आहे.  खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये तर मागास प्रवर्गासाठी ३५० रुपये शुल्क आहे.  अर्जाच्या शुल्कातून अंदाजे ७१.४ कोटी रुपये शासनाकडे जमा झाले आहेत.

१७ हजार ४७१ रिक्त जागांसाठी राज्यभरातून १७ लाख ७६ हजार २५६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. आचार संहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. – राजकुमार व्हटकर, अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई.