नागपूर: भारताने २००१ ते २०२२ या कालावधीत आगीमुळे तब्बल ३.५९ लाख हेक्टर वृक्ष आच्छादन गमावले आणि इतर सर्व नुकसानीमुळे २.१५ दशलक्ष हेक्टर नुकसान झाले. या २१ वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक नुकसान २००८ साली झाले. कारण यात तीन हजार हेक्टर वृक्ष आच्छादनाचे नुकसान आगीमुळे झाले, भारतीय वनसर्वेक्षण अहवालातूनच ही माहिती समोर आली आहे.

भारतात फेब्रुवारीच्या मध्यात आगीचा हंगाम सुरू होतो आणि सुमारे १४ आठवडे चालतो. मात्र, २२ ऑगस्ट २०२२ आणि २८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत १४ हजार ६८९ वेळा ‘फायर अलर्ट’ मिळाला. जंगलाच्या आगीत मोठ्या प्रमाणात हवामान संकटामुळे वाढ होते. जंगलातील आगीची तीव्रता वाढत आहे आणि २० वर्षांपूर्वीच्या तुलनेत जागतिक स्तरावर जवळपास दुप्पट वृक्ष आच्छादन जळत आहे. उष्ण कटिबंधातील आगीमुळे वृक्ष आच्छादनाचे नुकसान होत आहे आणि त्याचा परिणाम कार्बन उत्सर्जनावर होत आहे.

March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी

हेही वाचा… धक्‍कादायक! पती अनैतिक संबंधात ठरला अडसर; पत्‍नीने वडिलांच्या मदतीने केली हत्‍या

रशिया, कॅनडा, अमेरिका, फिनलंड, नॉर्वे, चीन आणि जपानमधील मोठ्या जंगलांना व्यापणारी ट्रॉपिकल जंगले आणि त्यानंतर ॲमेझॉनसारखे जैवविविधतेचे हॉटस्पॉट्स आणि आग्नेय-आशिया आणि भारतातील वर्षावनांचा समावेश असलेल्या उष्णकटिबंधीय जंगलांवर सर्वात वाईट परिणाम झाला आहे. उष्ण कटिबंधातील आगीमुळे वृक्ष कव्हरचे वाढते नुकसान जास्त कार्बन उत्सर्जनास कारणीभूत ठरत आहे. नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान भारतातील जंगलात दोन लाख २३ हजार ३३३ वेळा आग लागली. तर नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ दरम्यान दोन लाख १२ हजार २४९ वेळा आग लागली.