गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हिद्दुर गावात मध्यरात्री नक्षलवाद्यांनी रस्ते बांधकामावरील काही वाहनांची जाळपोळ केली. यावेळी त्यांनी पत्रक टाकले असून त्यात २२ डिसेंबर रोजी बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या हीद्दुर- दोबुर आणि पुढे कोयरकोटी जोडणाऱ्या रस्त्याचे मागील काही दिवसांपासून बांधकाम सुरू आहे. बांधकामस्थळी असलेल्या वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. यात एक जेसीबी, टँकरचा समावेश आहे.

हेही वाचा : राहुल गांधी आता विदर्भात पदयात्रा काढणार? कसा आहे उपक्रम, जाणून घ्या…

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
Property worth lakhs was robbed in two house burglaries in nashik
नाशिक : जिल्ह्यात दोन घरफोडींमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास
Shramjivi organization
ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब

यावेळी पत्रक टाकून त्यांनी २२ डिसेंबर रोजी भारत बंद यशस्वी करा, असे आवाहन केले आहे. या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला. विशेष म्हणजे, हा रस्ता पुढे छत्तीसगड राज्याला जोडणारा आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या दहशतीत मागील अनेक वर्षांपासून प्रशासन या रस्त्याच्या बांधकामासाठी प्रयत्नरत आहे, तर नक्षल्यांचा या बांधकामाला विरोध आहे.