वर्धा: राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळून आहेत. येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रकानुसार मुंबईत मुख्यमंत्री तर उर्वरित जिल्ह्यात पालकमंत्री राष्ट्र ध्वजारोहण करतील. मात्र काही मंत्री एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचे पालकमंत्री असल्यास शासनाकडून त्यांना एक जिल्हा निश्चित करून देण्यात येईल, असे नमूद आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते कोणत्या जिल्ह्यात झेंडावंदन करणार हे अद्याप कळलेले नाही. त्यांची पसंती गृह जिल्हा नागपूर की अन्य जिल्हा राहणार, याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

crores recovery, Palghar district,
पालघर जिल्ह्यातून १०० कोटींची वसुली, आमदार ठाकूरांचा पालकमंत्री रवींद्र चव्हाणांवर आरोप
thane lok sabha eknath shinde marathi news, eknath shinde thane lok sabha marathi news
ठाण्याचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात, बैठकसत्रापाठोपाठ आता प्रचार मिरवणूकांमध्ये सहभागी
Shivsena Thackeray group,
उपमुख्यमंत्र्यांना सभेपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून पनवेलकरांच्यावतीने पाच प्रश्न
eknath shinde, Thane, eknath shinde latest news,
मुख्यमंत्र्यांची ठाण्यासाठी मोर्चेबांधणी
eknath shinde kolhapur lok sabha marathi news
कोल्हापूरमध्ये दोन्ही उमेदवारांसाठी मुख्यमंत्र्यांचे अथक प्रयत्न
Anil Deshmukh Sunil Kedar and Abhijit Vanjari Hastily Deported From Wardha District
अनिल देशमुख, सुनील केदार, अभिजित वंजारी वर्धा जिल्ह्यातून तडकाफडकी हद्दपार, जाणून घ्या कारण…
Chief Minister Eknath Shindes rally to campaign for Mahayuti candidate Rajshree Patil Mahale
भर उन्हात मुख्यमंत्र्याचे जय श्रीराम, जय हनुमान…
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत

हेही वाचा… धान्यात अफरातफर भोवली; आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार निलंबित

कार्यक्रमस्थळी पालकमंत्री निश्चिती झाली नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री उपस्थित राहू न शकल्यास विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील, असे सूचित आहे. दोन महसूल विभागाचे मुख्यालय असलेल्या नागपूर व अमरावती येथे फडणवीस हेच पालकमंत्री असल्याने त्यांची पसंती कुठे, हे १५ ऑगस्टलाच कळणार.