लोकसत्ता टीम

वर्धा: विविध आरोपींना गुन्हा दाखल झाल्यावर जामिनासाठी धावपळ करावी लागते. त्यासाठी काही कागदपत्रे अपेक्षित असतात. प्रामुख्याने जो जामीन घेतो त्यास आपल्या घराची कर पावती सादर करावी लागते. चालू किंवा गतवर्षीची अशी पावती त्याच्याकडे नसल्यास तो नगर परिषद कार्यालयात धाव घेतो.

google location for bail
जामीन मिळवायचा असल्यास पोलिसांना गुगल लोकेशन द्यावं लागणार का? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय?
mystery, suicide, Mehta, father,
मेहता पिता पुत्रांच्या आत्महत्येचे गूढ कायम, कर्जबाजारी नसल्याचा सुनेचा दावा
can washing your hair regularly for 21 days keep dandruff away what dermatologist experts said read
केस २१ दिवस नियमितपणे धुतल्याने कोंड्याची समस्या दूर होते का? डॉक्टर काय सांगतात, वाचा
navi mumbai, gold, lure,
नवी मुंबई : स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून बोलावले आणि पोलीस असल्याची बतावणी करून १३ लाखांचा दरोडा टाकला 
pune Irregularities in onion purchase
कांदा खरेदीचा खेळखंडोबा सुरूच; भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या, कागदपत्रे रंगवून गैरव्यवहार
Loksatta editorial SEBI issues show case notice to Hindenburg in case of financial malpractice on Adani group
अग्रलेख: नोटिशीचे नक्राश्रू!
abu salem approaches bombay high court against transfer from taloja jail claims threat to life
“तळोजा कारागृहातून अन्यत्र हलवू नका”, अबू सालेमची उच्च न्यायालयात धाव; जीवाला धोका असल्याचा दावा
Government Municipal Corporation hearing from High Court on illegal hawkers
एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकू नका; बेकायदा फेरीवाल्यांवरून उच्च न्यायालाकडून सरकार, महापालिकेची कानउघाडणी

पण, इथे तर संपामुळे कार्यालय ओस पडलेले. परिणामी पावती मिळणे शक्य नाही. काही गुन्हे दाखल झालेल्या आरोपींना असा अनुभव आला. जामीन शक्य झाले नाही. हिंगणघाट व अन्य काही पालिकेत जमानतदार पावतीअभावी आपल्या स्नेह्यास मदत करू शकले नसल्याचा दाखला पुढे येत आहे. अशा प्रसंगी व्यक्तिगत जामिनावर सुटका करण्याचा मार्ग असतो. पण अनेकांना ते शक्य होत नाही.

आणखी वाचा- बुलढाणा : संपकरी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस, ठाकरे गट रस्त्यावर; वाढता पाठिंबा

काहींनी अस्थायी स्वरूपात कार्यरत कर्मचाऱ्यास कामास लावले. सहीचा कोंबडा मारून पावती साधली. तर एक दोघांनी ‘प्रसाद’ देत काम फत्ते केले. पण, संपामुळे जामीन अटींची पूर्तता करण्यास अडचणी येत असल्याचे खरे आहे, असा दुजोरा ॲड. अमोल कोटम्बकर यांनी दिला आहे. कुठून दुर्बुद्धी सुचली अन या काळात हातून विपरीत घडले, असेही सूर आहेत.