नागपूर : राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभ्रमण केले, याचे कौतुकच आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पुराव्यांअभावी टीका करणे, त्यांची निंदा करणे अगदी चुकीचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वि.स. जोग यांनी व्यक्त केले. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा – अवकाळी पावसाने पीक हानी, फडणवीस म्हणाले…

smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
father-in-law, extraordinary personality,
माझे सासरे : एक असाधारण व्यक्तिमत्त्व
Rahul Gandhi veer Savarkar marathi news
राहुल गांधी हाजीर हो…स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान
Nagpur university professor sonu jeswani
भाजपमधील मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून डॉ. कल्पना पांडे यांची मनमानी, ‘यांनी’ केला आरोप
sushma andhare on ajit pawar
Sushma Andhare : “सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन चुकलो”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “वरातीमागून…”
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare
“…तर १५०० परत घेऊ”, रवी राणांच्या विधानावर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “महायुतीच्या सरकारने…”

हेही वाचा – यवतमाळ : शिर्डीच्या साई संस्थानकडून ‘एमआरआय’ मशीन खरेदीसाठी १३ कोटींची मदत, पण…

अभद्र भाषेच्या वापरासाठी सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही समान जबाबदार आहेत. राजकारण्यांची डोकी ठिकाणावर आहेत का? असा सवाल साहित्यिकांनी राजकारण्यांना विचारावा, असा सल्ला जोग यांनी दिला. जोग यांच्या व्यक्तव्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही लगेच उत्तर दिले. जोग यांचे विचार मार्क्सवादी आहेत तरी त्यांचे सावरकरांवर प्रेम का आहे? याचे कोडे कुणालाही उलगडले नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेले विधान अऐतिहासिक नाही असे नव्हे तर ते लोकप्रिय नसल्याने आपल्याला मान्य नाही आहेत. विज्ञानाचे पुरस्कर्ते सावरकर हिंदुत्ववाद्यांना मान्य का नाही, असा खोचक सवालही जोशी यांनी कार्यक्रमात विचारला.