बुलढाणा : महावितरण ग्राहकांना अधूनमधून लहान मध्यम धक्के देत राहते. मात्र, यावेळी जिल्ह्यातील ग्राहकांनी महावितरणलाच तब्बल २१२३ कोटी रुपये थकबाकीचा मोठा ‘शॉक’ दिल्याचे चित्र आहे. यामुळे नूतन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या समक्ष महा वसुलीचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. बुलढाणा महावितरणच्या अधीक्षक अभियंता पदाची सूत्रे सुरेंद्र कटके यांनी स्वीकारली आहे. आज प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना थकबाकीचा तपशील मांडला. जिल्ह्यात घरगुती, वाणिज्य व औद्योगिक मिळून ४ लाख ८६ हजार ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे ७५ कोटी रुपये वीज बिलपोटी थकले आहे.

हेही वाचा >>> मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या पतीसाठी पत्नीचा संघर्ष!

water problems in Mira Bhayander area
मिरा-भाईंदरमध्ये भीषण पाणीटंचाई; दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद, नागरिकांचे हाल
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज
Kanjurmarg metro car shed, MMRDA, additional space
एमएमआरडीए कांजूरमार्गमधील जागेच्या प्रतीक्षेतच, कारशेडसाठी अतिरिक्त जागेची राज्य सरकारकडे मागणी

रस्त्यावरील दिव्यांचे (स्ट्रीट लाईट) १८२६ ग्राहक असून संबंधित संस्थांकडे २४४ कोटींची थकबाकी आहे. पाणीपुरवठा योजनेची ग्राहकसंख्या १४६३ इतकी असून ८६.४१ कोटी थकीत आहे. या ग्राहकांची एकूण संख्या ६. ५६ लाख इतकी असून थकबाकीची गोळाबेरीज २१२३ कोटीपर्यंत गेली असल्याचे कटके यांनी सांगितले. दरम्यान, ३१ मार्च पर्यंत वीज बिलाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध लवकरच कडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंत्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात विजतोडणी मोहीम हाती घेण्यात आली असून ही मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांकडील थकबाकी मोठी असल्याचे सांगून कास्तकारांनी ७० टक्के बिल भरले तरी त्यांचे पूर्ण बिल माफ करण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या वसुलीचा विनियोग कृषी क्षेत्रासाठी असलेल्या योजनावरच होतो, ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी बिल भरणा करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी या चर्चे अंती केले आहे.