बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवी प्रसिद्ध आहे. रामनवमी निमित्त येथे भव्य यात्रा भरते. दर्शनासाठी वेग वेगळ्या राज्यातून भाविकांचा जनसागर उसळला असून बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांची सभा चांगलीच गाजली. येथूनच त्यांनी बंजारा समाजाच्या प्रश्नावर आवाज उठविणार असून राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचे रणशिंग फुंकले आहे.

आयोजित सभेला संबोधित करताना रविकांत राठोड म्हणाले की, राज्यात बंजारा समाज मोठा आहे. मात्र केवळ राजकीय हेतू समोर ठेवून केवळ मत पेटीसाठी बंजारा समाजाचा वापर होतो. बंजारा समाजाच्या समस्या आजही तश्याच आहेत. आजही बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत बंजारा ब्रिगेड उतरणार आहे. जो राजकीय पक्ष, नेते बंजारा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देईल, त्या पक्षासोबत आम्ही जाऊ अन्यथा त्यांना बंजारा तांड्यावर बंदी घालू, असं वक्तव्य त्यांनी केले.

husband wife killed 6 injured in road accident
नागपूर : भीषण अपघातात पती-पत्नी ठार, ६ जखमी; कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक
School girl missing, Nanded city area,
पुणे : नांदेड सिटीतून शाळकरी मुलगी बेपत्ता, पोलीस आयुक्त रस्त्यावर, मुलगी सुखरूप रांजणगावमध्ये सापडली
ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण

हेही वाचा >>>यवतमाळच्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यालाही अडीच कोटी मागितले? दोन्ही लाचखोरांच्या संभाषणाचा तपशील समोर

राज्यातील शिक्षण क्षेत्रात रविकांत राठोड यांचे मोठे कार्य आहे. बंजारा समाजातील उभरते नेते म्हणून ते युवकांमध्ये लोकप्रिय आहेत. ऊसतोड कामगार ही बंजारा समाजाची ओळख पुसून टाकण्यासाठी बंजारा ब्रिगेड प्रयत्नशील राहील, असेही राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड म्हणाले. त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.