गोंदिया: शरद पवार आणि अजित पवार गटाचे एकत्रीकरणाबाबतच कुठलाही प्रस्ताव आमच्यापर्यंत अद्याप पोहचलेला नाही आणि यावर मी व्यक्तिगत माझं विचार मांडणे योग्य नाही याकरिता आम्ही पक्षातील सगळे लोक जी प्रमुख मंडळी चर्चा करून भाष्य करणेच योग्य राहील, असे मत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले. रविवार ११ मे रोजी गोंदिया येथील निवास स्थानी माध्यमांशी ते बोलत होते.

उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारने युद्धापासून माघार का घेतली आणि युध्द विराम का स्वीकारले ? असा सवाल उपस्थित केला. त्याला उत्तर देताना खासदार प्रफुल पटेल म्हणाले, अशा चिल्लर माणसाच्या सगळ्या गोष्टीच्या एवढ्या मोठ्या भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्या माणसाला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अ सुद्धा कळत नाही, आपल्या देशाचा फायदा कुठल्या बाबतीत आहे हे ज्यांना माहित नसेल, अशा चिल्लर राजकारण करणाऱ्याच्या बाष्कळ बडबडीला उत्तर देणे मला योग्य वाटत नाही.

भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्ध विराम शनिवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आला. पण त्यानंतरही रात्री ८ वाजेच्या सुमारास पाकिस्तानी सेनेकडून जम्मू, पठाणकोट, जैसलमेर अमृतसर ते भुज पर्यंत अनेक ड्रोन हल्ले भारतीय सीमेवर करण्यात आले पण भारतीय सेनेने आपले शौर्य दाखवून ते ड्रोन हल्ले निकामी केले. पाकिस्तानने खऱ्या अर्थाने युद्धविराम करायचे असेल तर हे थांबवायला पाहिजे शनिवारी रात्री असं सुचक इशारा आपले परराष्ट्र सचिव यांनी दिला आहे आज रविवारी पण पंतप्रधान यांनी सेनेच्या तिन्ही प्रमुखांना बोलावून त्यांच्याकडून सद्यस्थिती जाणून घेतली आहे. या युद्धात भारताची पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट भूमिका होती की आमची लढाई ही पाकिस्तानच्या सामान्य नागरिकासोबत नाही तर आमची लढाई ही आतंकवादी विरुद्ध आहे.

पहलगाममध्ये या पद्धतीने आमचे २६ नागरिक मारले हे अतिशय घृणास्पद होते म्हणून भारताने एक कठोर भूमिका घेत पाकिस्तानच्या आतंकवादा विरोधात ऑपरेशन सिन्दुर राबवून पहिल्यांदाच १९७१ च्या लढ्यानंतर पाकिस्तानच्या आत जाऊन आतंकवादी अतिरेक्यांचे ९ ठिकाण उध्वस्त केली, त्यानंतर पाकिस्तान कडून खूप ड्रोन हल्ले भारतीय सीमावरती भागात करण्यात आले पण ते आमच्या सेनेने निकामी केले, गेल्या दोन-तीन दिवसात पाकिस्तानच्या खूप आत मध्ये सीमेपलीकडे १५० ते २०० किलोमीटर पर्यंत आत जाऊन भारतीय सेनेने तिथले अनेको मिलिटरी हवाई तळ नष्ट केले आहे, भारतीय हल्ले वाढत असताना अमेरिकेची मध्यस्थी होणे स्वाभाविकच होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारण पाकिस्तान हा अंतिम वेळी घाबरून जाऊन अणुशक्तीचा वापर करू नये म्हणून अमेरिकेसह सौदी अरब, इराण या राष्ट्रांनी भारताला संयम बाळगण्याची विनंती केली होती. भारताला पहलगाम हल्ल्याचा उत्तर देणे अगत्याचे होते त्यामुळे त्यांच्या आतंकवादी ठिकाणावर हल्ला करून त्यांच्या मसूद अजहर यांच्या कुटुंबातील अनेक जण या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहे आमची लढाई ही पाकिस्तानी आतंकवाचा विरोधात होती हे आम्ही या हल्ल्यातून दाखवून दिले असल्याचेही खासदार प्रफुल पटेल याप्रसंगी म्हणाले.