मोहन अटाळकर

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला धान आणि हरभरा खरेदीच्या प्रश्‍नावर कोंडीत पकडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून या विषयावर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीत मतदानाबाबत शेवटच्या पाच मिनिटांमध्ये निर्णय घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.

१० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेना सध्या मतांची जुळवाजुळव करत आहे. या पार्श्वभूमीवर कडू यांनी दिलेला इशारा महत्त्वपूर्ण ठरतो.

बच्चू कडू म्हणाले की, “आमचे मतदान भाजपला जाणार नाही. मात्र, महाविकास आघाडीला देखील शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू. संपूर्ण महाराष्ट्रात हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख तर धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख आहे. केंद्र सरकार शेतमाल खरेदी करीत नाही. त्यामुळे त्यांनी एका हेक्टरला हजार रुपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हालचाली कराव्यात”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहे. तसेच आघाडी सरकारमधील मित्रपक्षांची मते फुटणार नाही. यासाठी देखील ठाकरे सरकार काळजी घेत आहे. त्यात आता ऐनवेळी बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.