लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण विदर्भातच नाही तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने ठाण मांडले आहे. वादळीवारा आणि गारपीटीसह होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज पुन्हा राज्याच्या अनेक भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. राज्याच्या काही भागात “रेड अलर्ट” तर काही भागात “ऑरेंज अलर्ट” दिला आहे.

Epidemic of waterborne diseases in the state
राज्यात जलजन्य आजारांची साथ! ‘ही’ काळजी घ्या…
A History of Geography A Rainy Road to Prosperity
भूगोलाचा इतिहास: समृद्धीचा पर्जन्यमार्ग
एसटी बसमध्ये प्रवासी विनातिकीट सापडल्यास…’या’ निर्णयाला वाहकांचा विरोध
यवतमाळ : जुगार खेळण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण! ‘या’ जिल्ह्याची अशी ओळख चिंतनीय
imd warned of heavy rains in vidarbha after July 19 orange alert in many districts
कोकणानंतर आता ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा….वाचा कुठे आहे ‘ऑरेंज अलर्ट’..?
imd issues red alert for raigad heavy rainfall in coast and ghat area
किनारपट्टी, घाटमाथ्यावर पावसाचा जोर; रायगडला लाल इशारा
Meteorological Department has forecast four days of heavy rain in Konkan Western Ghats area Pune print news dbj 20 amy 95
कोकण, पश्चिम घाट परिसरात चार दिवस मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज
Export of 3397 tonnes of mangoes from the facilities of Panaan
इंग्लंड, अमेरिकेत हापूस, केशर, बैगनपल्लीला पसंती!
Heavy rain, maharashtra, rain,
Maharashtra Weather Update : राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा

गेले दोन दिवस वादळीवारा आणि गारपीटीसह झालेल्या पावसामुळे अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी आणि फळबागाधारक शेतकरी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच आता हवामान खात्याने अकोला, वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांना “रेड अलर्ट” दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसेच हवामान खात्याने या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचाही इशारा दिला आहे. याशिवाय बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्येही आज “ऑरेंज अलर्ट” देण्यात आलेला आहे. इथेही वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्हे, संपूर्ण मराठवाडा, नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा “येलो अलर्ट” देण्यात आला आहे.

आणखी वाचा-अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये

हवामान खात्याने यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यात राज्यात नऊ एप्रिल पर्यंतच पाऊस होता. मात्र, आता पुन्हा एकदा १३ एप्रिल पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात १० ते १३ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यादरम्यान राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात घट झाली आहे. तीन दिवसांपूर्वीपर्यंत विदर्भात कमाल तापमानाने ४२ अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक तापमानाची नोंद केली होती. हा पारा वाढतच जाणार असे वाटत असताना अवकाळी पावसामुळे तो ४० अंश सेल्सिअसच्याही खाली गेला आहे. राज्याच्या इतर भागात म्हणजेच पुण्यातही १५ व १७६ एप्रिल असा दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मुंबई आणि कोकणात मात्र वातावरण कोरडे राहील, असा अंदाज आहे. राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये ढगाळ हवामानाचे सावट असून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.