नागपूर : राज्यात शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, दरवर्षीप्रमाणे यावेळीही निकालाचा टक्का घसरला आहे. ३ लाख १९६२ पैकी केवळ ६४ हजार ८३० परीक्षार्थी सीईटीसाठी पात्र ठरले आहेत.

हेही वाचा – प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित अंत! मित्राच्या बहिणीवर जीव जडला, मग भावानेच मित्राचा काटा काढला…

cm Devendra fadnavis mpsc
देवेंद्र फडणवीसांचा ‘एमपीएससी’ अध्यक्षांना फोन, संयुक्त परीक्षेच्या जाहिरातीबाबत…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
CET, new colleges in third round, CET news,
तिसऱ्या फेरीत नव्या महाविद्यालयांतील जागांचा समावेश ? सीईटी कक्षाचे संकेत; दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
opportunities after CTET Exam
शिक्षणाची संधी : सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट
Protest of women in front of Bank of Maharashtra for not getting the benefit of Ladaki Bahin Yojana Yavatmal
लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळाल्याने महिलांचा संताप
Non-Creamy Layer, income proof OBC, OBC,
ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?
Primary teachers across the state on leave for protest tomorrow
राज्यभरातील प्राथमिक शिक्षक उद्या आंदोलनासाठी रजेवर… शाळा बंद राहणार?
right to demand caste certificate when there is caste validity certificate High Court Inquiry
जातवैधता प्रमाणपत्र असताना जात प्रमाणपत्राची मागणी योग्य? उच्च न्यायालयाची विचारणा…

सध्या सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात पुन्हा २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत शिक्षक भरतीसाठी अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शिक्षण खात्याने दरवर्षी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दरवर्षी टीईटी घेऊन शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात टीईटी घेतली होती. यावेळी टीईटीच्या पहिल्या पेपरला १ लाख ४३ हजार ७२०, तर दुसऱ्या पेपरला १ लाख २७,१३१ परीक्षार्थी बसले होते. मात्र, दरवर्षीप्रमाणे शिक्षक भरतीसाठी पात्र ठरणाऱ्या परीक्षार्थींची संख्या कमी असल्याचे निकालावरून दिसून आले. पहिला पेपर दिलेल्यांपैकी फक्त १४ हजार ९२२, तर दुसरा पेपर दिलेले ४९ हजार ९०८ परीक्षार्थी पास झाले आहेत.

हेही वाचा – बुलढाणा : सिंदखेडराजा, देऊळगाव राजा तालुक्यात अवकाळीचे तांडव! अतिवृष्टीसदृश पावसाने झोडपले; हजारो हेक्टरवरील पिके आडवी

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात १३ हजार ५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना शाळांचे वाटप केल्यानंतर नवीन शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात झाली आहे.