आरमोरी येथील हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळल्याने मलब्याखाली दबून तीन जण जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. आकाश ज्ञानेश्वर बुराडे (२५), रा. निलज, ता. ब्रम्हपुरी, तहसीन इस्त्राईल शेख (३०) व अफसान शेख (३२), दोघेही रा. देसाईगंज अशी मृतांची नावे आहेत.

या दुर्घटनेत सौरभ चौधरी (२५), रा. मेंडकी, विलास मने, ५० व दीपक मेश्राम (२३), दोघेही रा. आरमोरी व आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. आरमोरी येथे भगतसिंह वॉर्डात एका जुन्या इमारतीत लालानी यांचे शोरुम आहे. ही इमारत धोकादायक असतानाही तेथे शोरुम सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी इमारतीचा मागचा भाग कोसळला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे तीन निष्पाप नागरिकांचा जीव गेला. यासाठी इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासन जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, शामसुंदर उराडे, जयश्री जराते, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, धर्मानंद मेश्राम, विनोद मडावी यांनी केली आहे.

गुरुवारी (७ ऑगस्ट) गडचिरोली नजीकच्या काटली येथे ट्रकने धडक दिल्याने चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज आरमोरीत इमारत दुर्घटनेत तीन जणांना प्राण गमवावे लागले. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

इमारत मालक व नगर पंचायत प्रशासनावर गुन्हे दाखल करा :  शेकाप

आरमोरी येथील हिरो शोरुमची इमारत मोडकळीस आल्यानंतरही इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे तीन निष्पाप नागरिकांचा जीव गेला. यासाठी इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासन जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, शामसुंदर उराडे, जयश्री जराते, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, धर्मानंद मेश्राम, विनोद मडावी यांनी केली आहे.