सुमित पाकलवार, लोकसत्ता

गडचिरोली : रामायणातील खलनायक पात्र रावण, ज्याचे दरवर्षी दसऱ्याला दहन केल्या जाते. अशा या रावणाच्या मुलाची चक्क एक नव्हे दोन मंदिरे गडचिरोलीत असून याठिकाणी दरवर्षी मोठी जत्रा भरत असते. इतकेच नव्हे तर नवसाला पावणारा ‘मेघनाथ’ म्हणून या भागातील लोकांची प्रचंड श्रद्धा आहे. मेघनाथाचे हे जगातील एकमेव मंदिर असल्याचा दावा येथील लोक करतात.

Krishna River, Datta Mandir, audumbar,
सांगली : कृष्णेचा औदुंबरच्या दत्तमंदिरात शिरकाव, वारणाकाठी सतर्कतेचा इषारा
Nrusinhawadi, Dakshindwar,
कोल्हापूर : नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दुसरा दक्षिणद्वार सोहळा; भाविकांनी केले पवित्र स्नान
Akkalkot, guru purnima, devotees,
अक्कलकोटमध्ये गुरूपौर्णिमेसाठी लाखाहून जास्त भाविक दाखल
Kedarnath temple controversy
“दिल्लीतील प्रति केदारनाथ मंदिर म्हणजे हिंदू परंपरेचा अपमान”, विरोध होण्याचं नेमकं कारण काय?
Jagannath Puri Temple
४६ वर्षांपूर्वी पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडाराचे दरवाजे उघडले होते, तेव्हा काय काय मिळालं?
Saturn's Nakshatra transformation for 87 days the holders
पैशांचा पाऊस पडणार! शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने ८७ दिवस ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार पैसा अन् मान-सन्मान
Idol Conservation at Jotiba Temple from Saturday Darshan closed till Thursday
जोतिबा मंदिरात शनिवारपासून मूर्ती संवर्धन; गुरुवारपर्यंत दर्शन बंद
Kolhapur District Renuka Bhakta Associations demand to change the idol of Mahalakshmi
महालक्ष्मीची मूर्ती बदलण्याची कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची मागणी

पुराणकथेत रामायणाबद्दल आजही लोकांच्या मनात प्रचंड आकर्षण आहे. यातील सर्वच पात्राची नावे त्यांच्या तोंडी आहे. यातील असेच एक मोठे पात्र म्हणजे, रावणाचा मुलगा ‘मेघनाथ’. ज्याने राम-रावण युध्दात ‘सर्पबाण’ चालवून लक्ष्मणाला घायाळ केले होते. त्याच लक्षमणाने नंतर मेघनाथचा वध केला. यावेळी त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. त्यातील शिर गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब येथे तर धड आरमोरी तालुक्यातील वासाळा येथे कोसळले. तेव्हापासून याठिकाणी मेघनाथाचे मंदीर आहे. अशी या परिसरात अख्यायिका आहे.

आणखी वाचा-“संजय गांधी निराधार योजनेचा निधी तत्काळ वितरित करा,” वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

देशातील हे एकमेव मंदीर असल्याचा दावा अनेकजण करतात. इतकेच नव्हे तर मेघनाथ नवसाला पावतो अशी येथील लोकांची श्रद्धादेखील आहे. त्यामुळे दरवर्षी येथे जत्रेचे आयोजन केल्या जाते. भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत नवस फेडतात. दत्त जयंती नंतरच्या पहिल्या गुरुवारी येथे जत्रा भरते. या जत्रेला दोनशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. असे गावातील जुनेजाणते सांगतात. वर्षभर मागितलेले नवस पूर्ण झाल्यानंतर मंदीरात भाविक लाकडी किंवा मातीचा घोडा ठेवतात. त्यापूर्वी नवस पूर्ण झालेले भाविक घोड्याची वाजतागाजत मिरवणूक काढतात. देशातील विविध भागात रावणाबद्दल आजही वेगवेगळा मतप्रवाह दिसून येतो. गडचिरोली जिल्ह्यातील काही आदिवासी बहुल क्षेत्रात रावणाची पूजा देखील केली जाते हे विशेष.