नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘तलाववाली’ ही वाघीण आणि ‘जंजीर’ हा वाघ पर्यटनाच्या या हंगामापासून पर्यटकांना दिसलेले नाहीत. अभयारण्यातील या हंगामातील पर्यटन सुरू झाल्यानंतर या दोघांच्याही पाऊलखुणा किंवा हालचाल पर्यटकांना आढळलेले नाहीत. त्यामुळे या दोन्ही वाघांच्या बेपत्ता होण्यामुळे वन्यजीवप्रेमी आणि वन्यजीव संवर्धकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा : “होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…

Two tigress cubs die in Pench Tiger Reserve
वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू, एकाचा जीवनमरणाचा संघर्ष…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
Guidelines for tourists Committee formed Nagpur news
पर्यटकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे; समितीची स्थापना
Eknath Shinde Shivsena Welcomes NCP Congress Leaders in Party
एकनाथ शिंदेंचा शरद पवार व काँग्रेसला दणका, नाशिकमधील मोठ्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
High Court Tourists interference with tigers is a failure of the Forest Department Nagpur news
उच्च न्यायालयाचे अधिकाऱ्यांवर ताशेरे; पर्यटकांकडून वाघांची अडवणूक हे वनविभागाचे अपयश!
Ganesh Naik talk about human and wildlife conflict and Solution plan
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले “वाघ मुंबईपर्यंत आले तर काय…”

टिपेश्वर अभयारण्यातील वाघांच्या बेपत्ता होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील या अभयारण्यातून वाघ बेपत्ता होण्याचे प्रकार घडले आहेत. ‘स्टार’ हा वाघ आणि ‘पिलखान’ ही वाघीण बेपत्ता झाले आहेत. त्यांचे काय झाले हे कुणालाही ठाऊक नाही. या घटना अभयारण्यात वाघांच्या संरक्षणासाठी प्रभावी शोध आणि तपासणी यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित करतात. संवर्धन तज्ज्ञांनी वनविभागाला ‘तलाववाली’ आणि ‘जंजीर’ यांच्या शोधासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. कॅमेरा ट्रॅप बसवणे, तज्ञ ट्रॅकर्सची मदत घेणे आणि शोधमोहीम राबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास केवळ बेपत्ता वाघांचाच नाही, तर अभयारण्याच्या पर्यावरणीय समतोलाचाही धोका निर्माण होऊ शकतो. वनविभागाकडून मात्र यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. मात्र, वन्यजीव प्रेमी आणि स्थानिक मार्गदर्शकांकडून लवकरात लवकर योग्य ती कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात अभयारण्य पर्यटनासाठी बंद होण्यापूर्वी या दोन्ही वाघांची हालचाल होती. पावसाळ्यानंतर पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्यानंतर ऑक्टोबरपासून या वाघांचा कोणताही ठावठिकाणा नाही. या अभयारण्यातून यापूर्वीदेखील वाघ बेपत्ता झाले आहेत. जेव्हा ‘स्टार’ हा वाघ बेपत्ता झाला तेव्हा त्याचा शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. मात्र, वनविभागाला यश मिळाले नाही. यावेळी तसे प्रयत्न होत नसल्याचे वन्यजीवप्रेमी आणि संवर्धकाचे म्हणणे आहे. दरम्यान, या अभयारण्यातून आजतागायत अनेक वाघांनी इतरत्र स्थलांतर केले आहे. त्यामुळे या वाघांनीसुद्धा इतरत्र स्थलांतर तर केले नाही ना, अशीही एक शंका व्यक्त केली जात आहे. कारण या काळात वाघ इतरत्र स्थलांतर करतात. यापूर्वी उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्यातून ‘जय’ हा वाघ बेपत्ता झाला होता. तर अलीकडेच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून ‘माया’ ही वाघीण देखील बेपत्ता झाली होती.

Story img Loader