नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये (नागपूर विभाग) २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत सतत विषमज्वराची (टायफॉईड) रुग्णसंख्या वर्षाला तीन हजाराहून खाली होती. परंतु, २०२२ मध्ये ही रुग्णसंख्या दुप्पटीहून जास्त म्हणजे तब्बल ६ हजार ८५८ एवढी आढळली आहे. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या वर्षभरात विषमज्वराचे २ हजार ७७१ रुग्ण नोंदवले गेले होते. परंतु, एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही रुग्णसंख्या २०२१ मध्ये २ हजार ८३६ तर २०२२ मध्ये तब्बल ६ हजार ८५८ रुग्ण एवढी नोंदवली गेली. परंतु, या आजाराचा एकही मृत्यू नसल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाल्याचे माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे.

heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या