वाशिम : विदर्भातील वाशीम आणि गडचिरोली जिल्हा निती आयोगाने निकाषानुसार मागास आणि अकांक्षित जिल्हे म्हणून घोषीत केले आहे. ही बाब माझ्यासह सर्वांसाठी अभिमानाची बाब नाही. त्यामुळे मागासलेपणाचा डाग पुसून टाकण्यासाठी सर्वकष प्रयत्नाची गरज आहे. राजकारणात खोटं बोलण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जर चांगले काम केले असेल तर लोक तुम्हाला मानतात त्यासाठी पोस्टर, बॅनर लावण्याची काहीच गरज काय ? असा टोला केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला..

हेही वाचा >>> सोयाबीनवर तो ‘पिवळा मोझॅक’ नसून… शास्त्रज्ञांच्या पथकाचा शासनाला अहवाल

Cleanliness is vital for environment some leaders guide world but they fail to act themselves
राजकीय नेते जगाला मार्गदर्शन करतात, मात्र स्वत: काहीच….गडकरींनी पुन्हा टोचले कान….
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Loksatta samorchya bakavarun A high level committee has been formed to conduct simultaneous elections all over the country Government
समोरच्या बाकावरून: त्यांनी सांगितले, यांनी करून टाकले!
Andhra Pradesh Deputy Chief Minister Pawan Kalyan
Tirupati Ladoos : “सनातन धर्म रक्षण मंडळ’ स्थापन करण्याची वेळ आलीय”, आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी
Sanglit kruti Committee warns that Gadkari will be shown black flags for opposing Shaktipeth
शक्तिपीठ’च्या विरोधासाठी गडकरींना काळे झेंडे दाखवणार, सांगलीत कृती समितीचा इशारा
after controvrcial remark on rahul gandhi bonde said in sense my statement makes mother angry with child
नागपूर : राहुल गांधींवर टीका करणारे भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले ” माझे वक्तव्य आई मुलाला रागावते त्या अर्थाने “
pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन
under Section 294 of IPC encouraging women in dance bar to dance is not offence High Court
डान्सबारमधील अश्लील नृत्यास प्रोत्साहन गुन्हा नाही, एकाविरोधातील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

वाशीम जिल्ह्यातील ३६५५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच ५९५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा भुमीपुजन सोहळा केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार भावना गवळी, विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, आमदार राजेंद्र पाटणी,लखन मलिक, अमित झनक, तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., माजी आमदार विजय जाधव, राजगुरू, जिल्हाध्यक्ष श्याम बढे, राजू पाटील राजे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, मगासलेपणाचा जिल्ह्याला लागलेल्या डाग सर्वच नेत्यांसाठी भूषणावह नाही. त्यामुळे जिल्हाला विकसित करण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन एक दिलाने काम करा. रस्त्यामुळे विकासाला चालत मिळत आहे. जिल्ह्यात चांगले रस्ते झाले पाहिजे. पण तरीही काही कंत्राटदारांना त्रास दिला जातो. मी कितीही पैसे द्यावला तयार आहे. असे म्हणताच उपस्थितांमधून एकच हाश्या पिकला तर काहींनी टाळ्याची साद दिली.

हेही वाचा >>> क्यूआर कोडशिवाय जाहिराती, ७४ विकासकांना कारणे दाखवा नोटिसा

जिल्ह्यातील एकमेव आणि बंद अवस्थेत असलेला बालाजी साखर कारखाना सुरू करण्याची एकमुखी मागणी जिल्ह्यातील लोक प्रतीनिधिनीनी गडकरी यंचाकडे केली असता सकारात्मक प्रतिसाद देत सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. आज केंद्रीय मंत्री जिल्ह्यात आले होते. ते ज्या मार्गाने कार्यक्रम स्थळी आले तो रस्ता अत्यंत दर्जाहीन असल्याचे सांगून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. व नव्याने सिमेंट रस्ता बांधून देतो ज्यावर पन्नास वर्षे खड्डे पडणार नाहीत, असे ही गडकरी म्हणाले.