बुलढाणा : जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने १ हजार ८६ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके व फळबागांना तडाखा बसला आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत ही बाब आढळून आली आहे. १५ फेब्रुवारीच्या संध्याकाळी व रात्री अवकाळी पावसाने वाऱ्यासह जिल्ह्यात हजेरी लावली. बुलढाणा, खामगाव व नांदुरा या तालुक्यात अवकाळीचा जोर जास्त होता. कृषी विभागाने आज शुक्रवारी केलेल्या पाहणीत या तालुक्यातील ४८ गावांना फटका बसल्याचे दिसून आले. तसेच १ हजार ८६ हेक्टर क्षेत्रावरील गहू, रब्बी ज्वारी, हरभरा व मका या पिकासह फळबागांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – गुरुजींना दहा रुपयांचा चहा पडला नऊ लाखांना!

Dhule district illegal mining marathi news
धुळे जिल्ह्यातील वनक्षेत्रात अवैधपणे गौण खनिज उत्खनन
Voting by wearing onion garlands to protest against the central government
नाशिक : केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांद्याच्या माळा घालून मतदान
A farmer is seriously injured in a wild boar attack in Wagad Ijara area of Mahagav taluka
सावधान! पाणी नसल्याने वन्यप्राण्यांची मानवी वस्त्यांकडे धाव; रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर
thane vegetable price today marathi news
वळीवामुळे भाज्या कडाडल्या, दरात २० रुपयांनी वाढ; नाशिक, पुणे जिल्ह्यांत उत्पादनात घट
hailstorm, maharashtra,
राज्यात पुन्हा गारपिटीची शक्यता, कोणत्या जिल्ह्यांसाठी गारपिटीचा इशारा?
Chandrapur, person died,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, बल्लारपूर तालुक्यातील घटना
nashik, Heavy Rains in nashik, Heavy Rains, Gale Force Winds, Cause Extensive Damage, Crops and Livestock, Nashik District, nashik news, marathi news,
नाशिकमध्ये पावसाने ५१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Palghar, Houses damage,
पालघर : वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड

हेही वाचा – नागपुरातील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूटच्या निवासी डॉक्टरांचे कामबंद…निदर्शने सुरू

सर्वाधिक तडाखा बसलेल्या बुलढाणा तालुक्यात ४०५ हेक्टरवरील गहू, शाळू, मका व हरभरा या पिकांची नासाडी झाली. तालुक्यातील १३ गावांतील शेतकरी बाधित झाले. खामगाव तालुक्यातील २० गावांतील ३७५ हेक्टरवरील फळबागा, गहू, हरभरा, मक्याचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यातील १५ गावांतील ३६०.५० हेक्टर क्षेत्रातील केळी, कागदी लिंबू, गहू, मका, ज्वारी पिके बाधित झाली. एकूण ४८ गावातील १०८६.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे. कृषी अधीक्षक अधिकारी मनोज ढगे यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना हा अहवाल सादर केला.