बुलढाणा : जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने १ हजार ८६ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके व फळबागांना तडाखा बसला आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत ही बाब आढळून आली आहे. १५ फेब्रुवारीच्या संध्याकाळी व रात्री अवकाळी पावसाने वाऱ्यासह जिल्ह्यात हजेरी लावली. बुलढाणा, खामगाव व नांदुरा या तालुक्यात अवकाळीचा जोर जास्त होता. कृषी विभागाने आज शुक्रवारी केलेल्या पाहणीत या तालुक्यातील ४८ गावांना फटका बसल्याचे दिसून आले. तसेच १ हजार ८६ हेक्टर क्षेत्रावरील गहू, रब्बी ज्वारी, हरभरा व मका या पिकासह फळबागांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – गुरुजींना दहा रुपयांचा चहा पडला नऊ लाखांना!

Damage to crops due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसान; विमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
child died in a leopard attack in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
Bhira, Navi Mumbai corporation, Bhira project,
नवी मुंबई : भिरा प्रकल्पाच्या पाण्यावर पालिकेचा दावा
Heavy rains in Akola damaged crops over 57 758 5 hectares in August and September
अकोला : अतिवृष्टीमुळे ५७ हजार हेक्टरवरील पिके मातीत; ऐन सणासदीच्या काळात….
Soyabean crop in danger due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात जास्तीच्या पावसाने सोयाबीनचे पीक धोक्यात
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
Death of a T-9 tiger, ​​Navegaon-Nagzira Sanctuary, tiger,
गोंदिया : वर्चस्वाच्या झुंजीत टी-९ वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील घटना

हेही वाचा – नागपुरातील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूटच्या निवासी डॉक्टरांचे कामबंद…निदर्शने सुरू

सर्वाधिक तडाखा बसलेल्या बुलढाणा तालुक्यात ४०५ हेक्टरवरील गहू, शाळू, मका व हरभरा या पिकांची नासाडी झाली. तालुक्यातील १३ गावांतील शेतकरी बाधित झाले. खामगाव तालुक्यातील २० गावांतील ३७५ हेक्टरवरील फळबागा, गहू, हरभरा, मक्याचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यातील १५ गावांतील ३६०.५० हेक्टर क्षेत्रातील केळी, कागदी लिंबू, गहू, मका, ज्वारी पिके बाधित झाली. एकूण ४८ गावातील १०८६.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे. कृषी अधीक्षक अधिकारी मनोज ढगे यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना हा अहवाल सादर केला.