नागपूर : भंडारा जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्रातील संवेदनशील जंगलातील सावरला येथील जंगलात वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्याचा मृत्यू झाला. गुरुवार, चार एप्रिलला दूपारी बारा वाजताच्या सुमारास सावरला नियत क्षेत्रातील कक्ष क्र. ३१३ मध्ये ही घटना घडली. याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने सावरला येथील रहिवासी ताराचंद सावरबांधे यांच्यावर हल्ला केला. यात ते जागीच ठार झाले. दरम्यान, घटनेची माहिती होताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा – ‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…

urad, soybean, Solapur, rain, Kharif,
सोलापूर : पोषक पाऊसमानामुळे दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात उडीद व सोयाबीनचा पेरा, १७० टक्क्यांवर खरीप पेरण्या
pregnant woman, jcb, Gadchiroli,
VIDEO : जेसीबीत बसून गर्भवतीने ओलांडला नाला, निकृष्ट रस्त्यांमुळे दुर्गम भामरागड तालुक्यातील नागरिकांचा जीव धोक्यात
bhaindar uttan marathi news
भाईंदरच्या उत्तन येथील घटना, खड्ड्यात बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
leopard
बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी
Heavy Rainfall in Thane District, Knee-deep water accumulated near kamwari river house, Severe Flooding in Bhiwandi, Disrupts Life and Commerce, Heavy Rainfall in Bhiwandi, Bhiwandi news, marathi news, latest news,
भिवंडी पावसाचे पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत, कामवारी नदी काठच्या वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले
Nashik, ATM, thieves, Satana taluka,
नाशिक : सटाणा तालुक्यातील एटीएम चोर ग्रामस्थांमुळे पोलिसांच्या ताब्यात
The husband also lost his life trying to save his wife in the flooded river buldhana
पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीनेही गमावला जीव; पुरात वाहून गेल्याने दाम्पत्याचा करुण अंत
five people survived after drown in waterfall in lonawala but three died
लोणावळा: ‘त्या’ धबधब्याच्या प्रवाहातून १० पैकी पाच जण सुखरूप वाचले, वाहून गेलेल्या ५ जणांपैकी तिघांचा मृत्यू

हेही वाचा – वंचितच्या उमेदवाराचे भाजप कनेक्शन, अपक्षाला पाठिंबा, काय आहे रामटेकचे राजकारण ?

राज्यातील मानव वन्यजीव संघर्षात गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली. यात माणसेच नाही तर जनावरे देखील मृत्युमुखी पडत आहेत. राज्यसरकारकडून मोबदला म्हणून कुटुंबियांना अर्थसहाय्य देण्यात येत असले तरी हा संघर्ष खात्याला थांबवता आला नाही. विदर्भात संघर्षाच्या सर्वाधिक घटना आहेत. गेल्या सहा वर्षात राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४२१ मानवी मृत्यू झाले. यात सर्वाधिक १११ मृत्यू २०२२-२३ या वर्षात झाले. २०१८-१९ या वर्षात ३६, २०१९-२० या वर्षात ४७, २०२०-२१ या वर्षात ८२, २०२१-२२ या वर्षात ८६, २०२२-२३ या वर्षात १११, आणि २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या वर्षात ५९ माणसे मृत्युमुखी पडली.