आवर्तन म्हणून सोडण्यात येणारे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहचावे, पाणी चोरी होऊ नये यासाठी निफाडसह सिन्नर तालुक्यातील काही गावांची वीज जोडणी खंडित करावी, असा आदेश जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी दिला आहे. दारणा धरणातून गोदावरी उजव्या आणि डावा कालव्यावरील तसेच दारणा, गोदावरी नदीकाठावरील सिंचनासाठी आणि पाणी पुरवठा योजनांसाठी आवर्तन म्हणून पाणी सोडण्यात येणार आहे. एक ते २५ मार्च कालावधीत हे आवर्तन सुरु राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिक : इच्छामरणासाठी चांदवडच्या १०१ शेतकऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collector order to disconnect power supply to some villages to reach rotation water zws
First published on: 05-03-2023 at 22:01 IST