लोकसत्ता वार्ताहर मनमाड - नाशिक जिल्ह्यातील येवला -मनमाड-अहमदनगर महामार्गावर अनकवाडे शिवारात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मालमोटार आणि कार यांच्यात धडक होऊन पाच युवकांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील पाचही मयत तरुण नाशिक येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आणखी वाचा-नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारपीट, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले. अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाल्याने स्थानिकांनी कार तोडून मृतदेह बाहेर काढले. मृतदेह विच्छेदनासाठी येवला उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहतूक कोंडी झाली होती. क्रेनच्या सहाय्याने मालमोटार बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातातील मयत तरुणांची अद्याप ओळख पटलेली नाही.