नाशिक – मे महिन्यात पावसाने जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे तीन हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले आहे. यातील निम्मे प्रमाण शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे असण्याचा अंदाज आहे. शासकीय निकषात उभ्या पिकासाठी नुकसान भरपाई मिळते. काढणीपश्चात पिकाला भरपाईची तरतूद नसल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
सहा मेपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असून आतापर्यंत साडेसहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक प्रमाण कांद्याचे आहे. मे महिन्यात अधिक्याने उन्हाळ कांद्याची काढणी होते. अनेक भागात शेतातून काढलेला कांदा खळ्यात ताडपत्रीत झाकून ठेवलेला होता. पावसाच्या तडाख्यात काढलेला आणि काढणीच्या मार्गावर असणाऱ्या कांद्याचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार शेतातील उभ्या पिकाच्या नुकसानीपोटी भरपाई मिळते. काढणी झालेल्या पिकाला भरपाई दिली जात नाही. पावसात दोन्ही प्रकारच्या कांद्याचे मोठे नुकसान झाले असल्याने सध्या सर्व कांद्याच्या नुकसानीचे पंचमामे केले जात आहेत. खळ्यात वा चाळीत भिजलेल्या कांद्याबाबत शासन पुढील निर्णय घेईल, असे कृषी विभागाचे अधिकारी सांगतात. जिल्ह्यात तीन हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाले. पंचनामे झाल्यानंतर यात शेतात काढणीवर आलेला आणि काढणी झालेल्या कांद्याच्या प्रमाणाची स्पष्टता होईल.
मे महिन्यात सहसा पाऊस येत नाही. त्यामुळे शेतकरी कांदा काढून तो शेतात सावलीत झाकून ठेवतात. यंदा सातत्याने झालेल्या पावसात या कांद्याचे मोठे नुकसान झाले. तो भरपाईच्या निकषात बसत नाही. पीक विमा कंपन्या एप्रिलनंतरचा कालावधी गृहित धरत नाहीत. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.भारत दिघोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना)