नाशिक – सिन्नर तालुक्यातील नायगाव शिवारात बिबट्याने दुचाकीस्वारांवर केलेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात बिबट्याचा संचार शेतकऱ्यांसह रस्त्याने जाऱ्ये करणाऱ्यांसाठी धोकादायक ठरु लागला आहे.

हेही वाचा >>> अपहार प्रकरणी धुळे जिल्ह्यात सरपंच, ग्रामविकास अधिकारी निलंबित

Villagers of Kundevhal Bambawipada suffer from respiratory problems due to dust from mines
कुंडेवहाळ, बंबावीपाडा ग्रामस्थांचे आयुष्य ‘माती’मोल; खदाणींच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, प्रशासनाचे दुर्लक्ष
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Mumbai national park encroachment loksatta news
राष्ट्रीय उद्यान लुप्त होईल… अतिक्रमणांवर कारवाई न केल्यावरून उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
Fishing boat sinks in sea near Alibaug 15 sailors safe
अलिबागजवळ समुद्रात मच्‍छीमार बोट बुडाली, १५ खलाशी सुखरूप
Maharashtra ST Bus Service
एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…

बुधवारी रात्री नायगाव शिवारातील वडझिरे रस्त्यालगत असलेल्या भीमाशंकर नर्सरीजवळ बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. अजय सिंह यांच्यासह त्यांचा मुलगा लखन आणि चेतन हे शेतातील कामे झाल्यानंतर दुचाकीने नायगावला येत असताना गवतात लपून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पळाला. वन विभागाच्या वतीने परिसरात बिबट्या जेरबंद होण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असले तरी नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. नायगावसह जळगाव, जोंगलेटेंभी, सोनगिरी, वडझिरे, देशवंडी, ब्राह्मणवाडी या भागात दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे.

Story img Loader