लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : लोकसभेच्या ४८ जागा असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता महाराष्ट्र आठवत आहे. त्यामुळे त्यांच्या राज्यात फेऱ्या वाढल्या आहेत. मणिपूरमध्ये केवळ दोन जागा असल्याने ते तिकडे गेले नाहीत. महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळासारखी संकटे आली. तेव्हा ते आले नव्हते. महाराष्ट्राने आर्थिक मदत मागूनही दिली नव्हती. मोदींकडून देश आणि गुजरात यामध्ये भिंत उभी केली जात आहे. देशातील हिंदुंमध्ये भेदभावाचे विष कालवले जात असून ते अतिशय घातक असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.

sanjay raut on raj thackeray
“’बिनशर्ट’ पाठिंबा देण्याऱ्यांनी एक महिन्यात भूमिका बदलली”, राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून संजय राऊतांची खोचक टीका!
Shyam Manav on Devendra Fadnavis
Shyam Manav : “सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये…”, देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांचा उल्लेख करून श्याम मानव यांचा पलटवार
Eight ex Corporators of Nationalist Sharad Chandra Pawar Party in Kalwa Mumbaira join Ajit Pawar Group
कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड यांना धक्का; आठ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश
mp women burried
रस्त्याच्या बांधकामाला विरोध केल्याने दोन महिलांना मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली गाडलं; मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना!
Sanjay Raut
Sanjay Raut : “देशात जवानांच्या हत्या होतायत, मोदींनी शपथ घेतल्यापासून…”, जम्मूतील परिस्थितीवरून संजय राऊतांची मोदी आणि शाहांवर टीका
dharmarao baba atram
तिसऱ्या आघाडीची चर्चा असतानाच शरद पवार- छगन भुजबळ भेटीवर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे महत्वपूर्ण विधान…
pooja khedkar audi challans
IAS Pooja Khedkar यांच्या कारने वाहतुकीचे तब्बल २१ नियम मोडले, २७ हजारांची दंडवसुली थकित
Bhagirath Bhalke meet Sharad Pawar
भगीरथ भालके शरद पवारांच्या भेटीला, घरवापसीच्या चर्चांना उधाण, पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार?

येथे ठाकरे गटाचे राज्यस्तरीय महाशिबीर झाल्यानंतर सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. सभास्थळी अंबाबाईच्या गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ठाकरे यांनी भाजपसह शिवसेना शिंदे गटाला लक्ष्य केले.

हेही वाचा >>>“वहिनी आता बाहेर पडायची वेळ आलीय”, भास्कर जाधवांचं रश्मी ठाकरेंना भावनिक आवाहन; म्हणाले…

छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत येथील इंग्रजांची वखार लुटली होती. पण मोदी आणि शहा महाराष्ट्राला लुटत, ओरबाडत आहेत. महाराष्ट्र ओरबाडला जात असताना भाजपला राज्यातील सत्तेसाठी साथ दिलेले काहीच करत नाहीत असा आरोप ठाकरे यांनी केला.

रश्मी ठाकरे यांना जाधव यांचे आवाहन

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर संपूर्ण भाषण केले. आपल्या माणसांवर अन्याय, आरोप होत असताना, चिखलफेक होत असतानाही त्या जराही डगमगल्या नाहीत. त्या चंद्राप्रमाणे शांत आहेत. आता घरात बसायचं नाही, आता बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले. जाधव यांचे भाषण सुरु असताना रश्मी ठाकरे भावूक झाल्या होत्या.