लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारचे कर्तव्य असते. परंतु, सरकार पळपुटे असल्याने ते इतर राज्यात प्रचाराला गेले, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली. इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. याप्रसंगी त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.

MP Anup Dhotre demands cash credit for agricultural loan supply to central government
अकोला : कृषी कर्ज पुरवठ्याला हवे ‘कॅश क्रेडिट’, खा. अनुप धोत्रे यांची केंद्र सरकारकडे मागणी
mahayuti stop loan sanctioned by centre to two sugar factories for not support in elections
विरोधकांच्या साखर कारखान्यांची कर्जकोंडी; लोकसभा निकालानंतर राज्य सरकारचा कडू डोस
Cases have been registered against the banks which deprived the farmers of crop loans by demanding CIBIL and other documents
पीक कर्जाबाबतचे आदेश व्यापारी बँकांनी धुडकावले; अडवणुकीने विदर्भातील शेतकरी सावकारांच्या दारात
case registered against 22 including sharad pawar group mla jitendra awad at mumbra police station
आमदार जितेंद्र आव्हाडांसह २२ जणांवर गुन्हे दाखल; खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा तक्रारदारीत आरोप
sharad pawar criticized on government schemes over implementation
सरकारच्या योजना फसव्या, लागू होण्याबाबत शंका – शरद पवार
principal, vehicle, female employees,
मानसिक त्रास देण्यासाठी प्राचार्यांनी दिले महिला कर्मचाऱ्यांच्या वाहनातील हवा सोडण्याचे आदेश, प्राचार्यांच्या अजब प्रतापाविरोधात….
Pressure from the rulers to give loans without seeing the farmer CIBIL
शेतकरीसरकारच्या कात्रीत बँका; ‘सिबिल’ न पाहता कर्ज देण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा दबाव
Kunbi certificate to Marathas with historical context Governments decision to divide Maratha society
ऐतिहासिक संदर्भ असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र : सरकारच्या निर्णयाने मराठा समाजात दुही

खासदार राऊत यांनी इगतपुरी तालुक्यातील वाघेरे, पाडळी, गोंदे, वाडीव-हे आदी गावातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिस्थिती भीषण आहे. ही परिस्थिती बघून डोळ्यात पाणी आले. भात पीक आणि बागायती पिकाची मोठी हानी झाली असून या वर्षी दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन शेतकऱ्यांकडे नाही. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही सर्व बांधावर जाऊन पाहणी करत आहोत, असे राऊत यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार निर्मला गावित यांनी, उध्दव ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना खरोखर मदत मिळाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी देखील हे मान्य केले की, ठाकरे सरकारच्या काळातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली. या सरकारच्या काळात मात्र मदत मिळाली नाही. दोन दिवस पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी उदध्वस्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत सरकारने जाहीर करावी, अशी मागणी गावित यांनी केली.

आणखी वाचा-‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ विरोधात मालेगावकर आंदोलनाच्या पवित्र्यात

या दौऱ्यात नितीन पानगुडे पाटील, नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, तालुका प्रमुख भगवान आडोळे आदी उपस्थित होते.