नाशिक : पावसाचा लपंडाव सुरू असताना ऑगस्टच्या प्रारंभीच जिल्ह्यातील नऊ धरणे तुडुंब भरलेली असून उर्वरित पाच धरणेही भरण्याच्या स्थितीत आहे. अन्य दारणा आणि गंगापूरसारख्या मोठय़ा व मध्यम धरणात जलाशय परिचालन सुचीतील वेळापत्रकानुसार जलसाठा करावा लागल्याने मुसळधार पाऊस होऊनही ती पूर्ण क्षमतेने भरता आली नाहीत. जिल्ह्यात सध्या ५५ हजार १६१ दशलक्ष घनफूट म्हणजे ८४ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातून ४७ टीएमसी पाणी गोदावरी नदीतून मराठवाडय़ाकडे प्रवाहित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रारंभीच्या जून महिन्यात प्रतीक्षा करायला लावलेल्या पावसाने जुलैत सर्व कसर भरून काढली. १० ते १५ दिवस इतका पाऊस झाला की, नद्या, नाल्यांना पूर आला होता. अनेक तालुके जलमय झाले. अवघ्या काही दिवसात बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आली. पावसाचा जोर नंतर कमी झाला. तूर्तास तो अधूनमधून हजेरी लावतो. पावसाला अद्याप दोन महिने अवधी आहे. तत्पूर्वीच जलसाठा लक्षणीय उंचावला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार आळंदी, वाघाड, ओझरखेड,  तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही नऊ धरणे तुडूंब भरली आहेत. गौतमी गोदावरी (८४), काश्यपी (९४ टक्के), करंजवण (८१), मुकणे (९१). गिरणा (९०) ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water storage in dams 47 tmc water flows jayakwadi ysh
First published on: 03-08-2022 at 00:02 IST