नवी मुंबई : धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने, सिडकोने सिडको अधिकारक्षेत्रातील नोड आणि गावांतील नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले असून २७ जूनपासून २५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिडकोतर्फे सिडको अधिकारक्षेत्रातील विविध नोड, गावे आणि हेटवणे पाणीपुरवठा योजना जलवाहिनी मार्गावरील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. सिडकोचे हेटवणे धरण, नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण, एमआयडीसीचे बारवी धरण आणि मजीप्राचे पाताळगंगा धरण या जलस्रोतांद्वारे सिडकोकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु उपरोक्त धरण क्षेत्रांत अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणी साठ्यात पाणीपुरवठा करणे अवघड झाले आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिडकोने नागिरकांना पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन केले असून २७ जूनपासून २५ टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.

Water tariff, Kalyan Dombivli, Administration decision,
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय
unclean water supply, Thane, Rumors of unclean water,
ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी