उरण : पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असल्याने या काळात सुक्या मासळीवर अवलंबून राहावे लागते. मात्र आवक घटल्याने सुक्या मासळीचे दर वाढू लागले आहेत. या वर्षी कोळंबीच्या सोड्याचे दर हे किलोला १ हजार ३०० रुपयांवर पोहोचले आहेत. महिनाभरावर पावसाळा आला असून सुक्या मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे अन्न असलेले बोंबील आणि करंदीचे दर गगनाला भिडले आहेत. हे दर किलोला ६०० रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र तरीही किनारपट्टीवरील रहिवासी खिशाला चाट देत सुकी मासळी खरेदी करीत आहेत.

हेही वाचा…कल्याण मध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा…मार्गात बदल…समजून घ्या… 

Malegaon, water shortage, Chankapur Dam, Girna Dam, monsoon, Municipal Corporation, water supply, rainfall, water conservation, water wastage, drinking water, Malegaon news, nashik news, marathi news,
पावसाळ्यातही मालेगावात पाणी कपातीचे संकट, आता तीन दिवसाआड पुरवठा
Hetwane Dam, heavy rains, Pen taluka, water cut, Kharghar, Ulwe, Dronagiri, Raigad district, drinking water, CIDCO, water storage, dam gates, water release, Bhogeshwari riverside, water tankers,
हेटवणे धरणाचे ६ दरवाजे उघडले आता तरी पाणी कपात रद्द करा – रहिवाशांची मागणी
heavy rain, thane district, Barvi Dam, storage, 60 percentage
बारवी धरण ६० टक्के भरले, २४ तासांत ६ टक्क्यांची वाढ
rain, Bhima Valley, Sahyadri Ghats,
सोलापूर : सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पावसाचा जोर; उजनीत वाढतोय पाणीसाठा
Big fall in gold price in five days Nagpur
आनंदवार्ता.. पाचदिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण.. हे आहेत आजचे दर..
vehicles stopping at Kasara ghat marathi news
कसारा घाटात थांबणाऱ्या वाहनांना आवर, अपघात रोखण्यासाठी ना वाहन तळ क्षेत्रात लोखंडी जाळ्या
tiger
Video: बछड्यांसह वाघीण निघाली ऐटीत….पण, भररस्त्यात असे काही घडले की चवताळून थेट पर्यटकांवर…
How to drive through waterlogged roads during monsoons 5 tips for driving safely through floods
पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहन कसे बाहेर काढावे? या महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करा

सागरी किनारपट्टीवर खोल समुद्रातील, खाडीतील ताजी आणि यातीलच निवडक सुकविलेली मासळी मिळते. यातील सुकी मासळी ही पावसाळ्यात मासळीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सुकविलेल्या मासळीचा वापर केला जातो. परंतु समुद्रातील मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शिल्लक आणि लहान आकाराची मासळी सुकविली जाते. त्याचेही प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे ही मासळी सुकविण्यासाठी लागणारी जागा ही उपलब्ध नसल्याने मच्छीमारांना मासळी सुकविणे कठीण झाले आहे. परिणामी सुक्या मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. या वाढत्या अडचणीमुळे सुक्या मासळीचाही दुष्काळ निर्माण झाला आहे.