लोकसत्ता टीम

उरण: एमआयडीसीच्या रानसई धरणाच्या जलवाहिनीला मंगळवारी सकाळी चिर्ले ते जासई दरम्यान गळती लागली. त्यामुळे मंगळवार पासून रद्द करण्यात येणारी पाणी कपात होऊ शकली नाही. मात्र जलवाहिनीची दुरुस्ती झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल अशी माहिती एमआयडीसी कडून देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरण तालुक्यातील बहुतांशी परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या घटलेल्या पाणी साठ्यामुळे जानेवारी महिन्या पासूनच आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार अशी दोन दिवसांची पाणी कपात करण्यात आली आहे. मात्र उशिरा का होईना पावसाने जोरदार हजेरी लावण्याने रानसई धरण ४१ टक्के भरले आहे. त्यामुळे रानसईतून करण्यात येणारी पाणी कपात मंगळवार पासून रद्द करण्याचा निर्णय एमआयडीसी ने घेतला होता. त्याचदिवशी सकाळी ही गळती लागल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. परंतु गळती दुरुस्तीचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल अशी माहिती उरण एमआयडीसीचे अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली.