नवी मुंबई : मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तसेच गोव्याला जोडणाऱ्या शीव-पनवेल महामार्गावर स्थानिक गुंड खासगी बसचालकांकडून बळजबरीने हप्तेवसुली करत आहेत. मात्र वेळेवर प्रवाशांना पोहचवणे अनिवार्य असल्याने बसचालक पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. मात्र हे प्रकार जास्त वाढल्याने वाहतूक संघटनांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक व वाहतूक संघटनेने याबाबत पोलीस उपायुक्त यांना निवेदन दिले आहे.

शीव-पनवेल महामार्गावरून हजारो प्रवासी बस रोज ये जा करत असतात. मुंबईच्या वाहतूक कोंडीतून सुटून या बस जेव्हा नवी मुंबईत प्रवेश करतात तेव्हा बहुतांश गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने येतात. बस ज्या ज्या ठिकाणाहून प्रवासी भरते अशा ठिकाणी स्थानिक गुंड बस चालकांकडे हप्ता मागत असतात. हा प्रकार सर्वाधिक सानपाडा आणि जुईनगर येथे होतो. वाशी आणि सीबीडी येथे नजरेच्या टप्प्यात वाहतूक पोलीस चौकी असल्याने या दोन्ही ठिकाणी फार तुरळक असे प्रकार होतात. हे हप्ते ५ हजारांपर्यंत मागितले जातात आणि शेवटी तडजोड करीत मिळेल ती रक्कम स्वीकारली जाते.

Protest of students, traffic jam, chinchoti road,
वसई : वाहतूक कोंडीपासून त्रस्त विद्यार्थी व भूमिपुत्रांचे आंदोलन, महामार्ग व चिंचोटी रस्त्याच्या समस्येबाबत संताप
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
satara three crores looted
सातारा : महामार्गावर व्यापाऱ्याची तीन कोटींची रोकड लांबवली
satara midc cancel marathi news
सातारा महामार्गालगतची वेळे प्रस्तावित औद्योगिक वसाहत रद्द, सरकारची अधिसूचना जारी
Vasai, Pedestrian bridge work, National Highway,
वसई : राष्ट्रीय महामार्गावर पादचारी पुलांची कामे अंतिम टप्प्यात, रस्ते ओलांडून होणारे अपघात रोखणार
msidc to construct elevated 54 km pune shirur road to connect to samruddhi expressway
रस्तेविकासावरून रस्सीखेच; शिरूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम ‘एमएसआरडीसी’ऐवजी ‘एमएसआयडीसी’कडे
highway projects in Maharashtra
‘भक्तिपीठ’ आणि ‘औद्योगिक’ महामार्गांचेही भवितव्य अधांतरी
Proposal to cancel the land acquisition process of Shaktipeeth Highway
महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाचे भवितव्य अधांतरी? भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याचा प्रस्ताव?

आणखी वाचा-एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती

याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले तर किमान तीन ते चार तास लागतात. त्यामुळे चालक पोलिसाकडे जात नाहीत. तक्रारच होत नसल्याने पोलिसही लक्ष देत नाहीत. मात्र आता संघटनेच्या माध्यमातून तक्रार करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक व वाहतूक संघटनेने याबाबत पोलीस उपायुक्त यांना निवेदन दिले आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून निवेदन देण्यात आल्याची माहिती संघटनेनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे यांनी दिली.