पनवेल : रात्री एक वाजेपासून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील एम आणि व्ही ब्लॉकमध्ये वीज नसल्याने कारखाने डीझेलच्या जनरेटवर सुरू ठेवण्यात आले आहेत. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील ज्या परिसरात वीज गायब झाली तेथे सर्वाधिक शितगृहे आणि बॉयलर असल्याने या आस्थापना विजेविना सुरू ठेवल्या जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. विजेच्या या संकटामुळे तळोजातील उद्योग क्षेत्र धास्तावले आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : अति खराब हवेवर हिरवळीचा उतारा ! शहरात हरित पट्टा आणि पाण्याचे कारंजे बसवून हवा प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

हेही वाचा – नवी मुंबई : कोकण विभाग मतदार संघाच्या नवीन मतदार यादीत ३७ हजार ७१९ मतदार

तळोजात एम ब्लॉकमध्ये ३० हून अधिक शितगृहे आहेत. तर, एम ब्लॉकमध्ये ६० हून अधिक कारखाने आहेत. रात्रीपासून वीज गेल्यानंतर जनरेटरवर कारखाने चाललेत. मात्र, १० तास उलटले तरी वीज न आल्याने स्थानिक वीज महावितरण कंपनीला संपर्क साधण्यात आला. तेथे कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महावितरणच्या भांडुप येथील प्रकाशगड कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. तेथील वरिष्ठ अधिकाऱ्याने, कर्मचारी संपावर गेलेत, आम्ही काय करणार, असे उत्तर तक्रारदाराला दिले. यामुळे हताश झालेले उद्योजक जनरेटरवर अजून किती वेळ उद्योग सुरू ठेवावे? अशा पेचात अडकले आहे. 12 तासांनंतर जनरेटर सुरू ठेवल्यास जनरेटर गरम होऊन दुर्घटनेच्या शक्यतेने उद्योजक वीज कर्मचाऱ्यांचा संप तातडीने कसा मिटेल, याकडे लक्ष लावून आहेत.

रात्रीपासून तळोजा उद्योग क्षेत्रात वीज नसल्याने अनेक शीतगृहे आणि कारखाने ठप्प झाले आहेत. कारखानदारांना याचा फटका बसलाच आहे, परंतु सरकारचे महसुली उत्पन्न यामुळे बुडणार आहे. कारण यातील अनेक शीतगृहांमधील माल परदेशात निर्यातीसाठीचा आहे. सरकारने वीज कर्मचाऱ्यांच्या मागणीचा तातडीने विचार करावा, अशी प्रतिक्रिया टीएमएचे माजी अध्यक्ष संदीप डोंगरे यांनी दिली.