मोबाईल चोर असल्याच्या केवळ संशयावरून तीन जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मारहाण करणाऱ्यांविरोधात चौकडी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. इम्रान खान, इलियास खान, रमेश सहानी आणि उजैन फारुकी असे आरोपींची नावे आहेत. यामध्ये मारहाण सोडवायला गेलेल्या व्यक्तीलाही आरोपींनी मारहाण केल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा- पनवेलमध्ये आढळला पुणे येथील संजय कार्लेचा मृतदेह

ravi rana bachchu kadu
“आम्ही तुमच्या खासगी गोष्टी बाहेर काढल्या तर…”, बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

वासिम कुरेशी हे नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील गुणीला कंपनीत काम करीत असून तुर्भे येथे राहतात. शनिवारी रात्रपाळी करून पहाटे पाचच्या सुमारास ते घरी परतत होते. तुर्भे मच्छी मार्केटजवळ त्यांना त्यांचा मित्र शहीद शेख हा भेटला व त्यांचे अन्य मित्र व भाऊ अमीर व सलमान यांना काही युवक मारहाण करीत असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच वासिम हे घटनास्थळी गेले व त्यांनी हे भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनाही बेदम मारहाण झाली. आरोपी वासिम यांच्या मित्रांना मोबाईल चोर समजून माराहण करत होते. वासिम आपली रात्रपाळी करून घरीच परतत होते. मारहाण करण्यात येणाऱ्या व्यक्ती चोर नसल्याची बाब वासिम यांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. शेवटी मारहाण करून ते पळून गेल्यावर याबाबत तुर्भे पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. तत्पूर्वी वासिम त्यांचा भाऊ व अन्य एकावर वाशीतील मनापा रुग्णालयात उपचार करण्यात आले.