– डॉ. यश वेलणकर

‘आहार विकृती’मध्ये अधिक खाणे- म्हणजे ‘बिंज ईटिंग’ हाही एक प्रकार आहे. ही मानसिक विकृती असलेली व्यक्ती पोटाला तडस लागेपर्यंत खाते. असे खाताना तिला समाधान होत नाही. आठवडय़ात किमान दोन वेळा असे होत असेल, तर त्यावर मानसोपचार घ्यावे लागतात. कारण असे खाणे हे एक लक्षण आहे; त्याचे मूळ कारण सुप्त मनातील असुरक्षिततेची भावना हे असते. बेभान होऊन खाणे हा त्रासदायक भावनांपासून पळून जाण्यासाठी त्या व्यक्तीला गवसलेला तो चुकीचा उपाय असतो. चिंता कमी करण्यासाठी काही जण दारू पितात, तसे ही व्यक्ती अधिक खाते. अर्थातच, अशा अतिरेकी खाण्याचे दुष्परिणाम होतातच. अपचन हे अशा व्यक्तीसाठी नेहमीचेच असते. अधिक खाल्ल्याने वजन वाढते आणि त्यामुळे होणारे सारे आजार होतात.

best time to shower morning or night what time of day should you shower heres what doctors recommend read
सकाळ की रात्र; अंघोळीची योग्य वेळ कोणती? डॉक्टर काय सांगतात? वाचा….
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

असे एका वेळी खूप खाणे हे बटाटा वडय़ासारख्या एखाद्या पदार्थाचे असू शकते किंवा जेवणातील सर्वच पदार्थ अधिक खाल्ले जातात. असा त्रास असलेली व्यक्ती खूप भराभर खाते. खाताना इतर माणसे बरोबर असतील तर ती अधिक खाण्याची चेष्टा करू लागतात, त्यामुळे ही व्यक्ती काही वेळा एकटय़ानेच खाणे पसंत करते. काही जण रात्री झोपेतून उठून खातात. भूक नसतानाही खाण्याची तीव्र इच्छा होते आणि त्या वेळी दुसरे काहीही सुचत नाही. खाऊन झाल्यानंतर अपराधीभाव आणि उदासी येऊ शकते. ‘डायग्नोस्टिक अ‍ॅण्ड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल’ या मानसिक विकृतीच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या पुस्तकात २०१३ साली या विकृतीला स्वतंत्र स्थान मिळाले आहे.

आहार कोणता आणि किती घ्यावा याबाबतचा सल्ला देऊन ही विकृती बरी होत नाही. कारण आपण अति खातो ते चुकीचे आहे हे त्या व्यक्तीला समजत असतेच; तरीही ती स्वत:ला थांबवू शकत नाही. कोणतेही व्यसन केवळ उपदेशाने बरे होत नाही; ती कृती न केल्याने येणाऱ्या अस्वस्थतेला कसे सामोरे जायचे याचे प्रशिक्षण व्यसनमुक्तीसाठी आवश्यक असते. तसेच या आहार विकृतीसाठीही ते आवश्यक असते. त्यामुळे या विकृतीला अति खाण्याचे व्यसन असेही म्हणता येते. दिवसभरात अधिकाधिक वेळा भावनांची नोंद करणे, मन अस्वस्थ असेल तेव्हा शरीरातील संवेदनांचा स्वीकार करणे, खात असताना सजग राहणे आणि विचार व कृती यांमध्ये फरक करण्यास शिकणे, याने ही विकृती बरी होते.

yashwel@gmail.com