डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्गाने मानवाला एक अतिविकसित मेंदू दिला, परंतु स्वसंरक्षणासाठी इतर प्राण्यांप्रमाणे वेगाने पळणे, जबडय़ाची ताकद, दात, नख्या अशा कोणत्याच रचना दिल्या नाहीत. त्यामुळे शस्त्र वापरणे हे मानवजातीसाठी अनिवार्य झाले. शिवाय दोन पायावर चालणे सुरू झाल्यामुळे, मोकळ्या झालेल्या हातांनी निरनिराळे दगड, गारगोटय़ा, खडे असे काहीबाही हाताळताना आणि फेकून मारताना शस्त्र वापरायच्या कल्पनेचा उदय झाला असावा. एखादा दगड भक्ष्याच्या मर्मस्थानी लागून शिकार साधली गेल्यावर आदिमानवाला ‘शस्त्र’ या संकल्पनेची उकल झाली असावी. भविष्याचा विचार करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्याने उद्याचे भक्ष्य मिळवण्यासाठी आजच दगड घासणे सुरू केले. अगोदर स्वसंरक्षणासाठी आणि नंतर दुसऱ्या जिवांचा अंत करण्यासाठी शस्त्र वापराचा हा सिलसिला तेव्हापासून सुरू झाला. सुरुवातीला नैसर्गिकरीत्याच टोकदार असलेले दगड वापरून झाल्यानंतर, त्याने गारगोटीसारख्या दगडावर तासकाम चालू केले असावे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about ashmyugin hatyare
First published on: 04-01-2019 at 01:12 IST