मानसिक तणाव लगेच कमी करण्यासाठी दीर्घ श्वसन उपयोगी असते; मात्र त्यामुळे असा तणाव येण्याची सवय बदलत नाही. याचे कारण आपण असे दीर्घ श्वसन करू लागतो, त्या वेळी आत्ताचा हा तणाव वाईट आहे, तो नको अशी प्रतिक्रिया करीत असतो. अशी प्रतिक्रिया हे भावनिक मेंदू ‘अमीग्डाला’चे काम आहे. मेंदूचा हा भाग अतिसंवेदनशील झाल्यानेच तणाव, भीती यांचे प्रमाण वाढत असते. असा वारंवार होणारा त्रास कमी करायचा असेल तर त्याची अतिसंवेदनशीलता कमी करायला हवी. ती दीर्घ श्वसनाने होत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ती कमी करण्यासाठी साक्षीभाव आवश्यक असतो. कोणतीही कृती करतो, काही बदल करतो त्या वेळी आपण कर्ता असतो. श्वासगती बदलतो, प्राणायाम करतो त्या वेळी आपण कर्ता असतो. मनातील विचार बदलण्याचा प्रयत्न करतो त्या वेळीही कर्ता असतो. साक्षीभाव म्हणजे हे काहीही करायचे नाही. शरीरात आणि मनात जे काही होते आहे ते जाणायचे; पण त्याला हे चांगले-हे वाईट अशी प्रतिक्रियाही करायची नाही. अशी प्रतिक्रिया न करणे म्हणजे साक्षीभाव! अशी प्रतिक्रिया करत नाही त्या वेळी ‘अमीग्डाला’वरील कामाचा बोजा आपण कमी करतो, सतत प्रतिक्रिया करण्याची गरज नाही असे प्रशिक्षण त्याला देत असतो. त्यामुळे त्याची अतिसंवेदनशीलता कमी होते.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article manovedh akp 94
First published on: 12-02-2020 at 00:06 IST