डॉ. नीलिमा गुंडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काल हे जगण्याचे एक महत्त्वाचे परिमाण आहे. जीवनव्यवहारातील कालविषयक संवेदन वाक्प्रचारांतूनदेखील व्यक्त होते. पंच पंच उष:काली, असा वाक्प्रचार जुन्या साहित्यात आढळत असे. सूर्योदयाच्या पूर्वी पाच घटकांचा काळ असा त्याचा अर्थ आहे. घटका म्हणजे ६० पळांचा किंवा २४ मिनिटांचा काळ होय. ‘पंच पंच उष:काली रविचक्र निघो आले’, असा अरुणोदय त्यातून कळतो. तांबडे फुटणे हा वाक्प्रचार ‘फुटणे’ या क्रियापदाचा सर्जनशील अर्थ सुचवतो. सूर्योदयापूर्वी आकाश तांबडय़ा रंगाचे झालेले असते. या नैसर्गिक रूपाचे संवेदन यात आले आहे. तांबडे फुटणे म्हणजे उजाडणे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhashasutra sentences life sensation through phrases express was ysh
First published on: 16-11-2022 at 00:02 IST