डहाणू : डहाणू शहरातील मासोली संत रोहिदास नगरची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे  गेले सात-आठ दिवसांपासून पाण्याची नासाडी होत आहे.   तक्रार करूनही नगर परिषद त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

साखरा धरणातून डहाणू शहराला पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी आहे. सरावली जलशुद्धीकरण केंद्राच्या आधी सरावली तलावपाडा, रोहिदास नगर येथे मुख्य जलवाहिनीला काही भागात गळती लागली आहे. त्यामुळे रोहिदास नगर  येथे मुख्य रस्त्यावर पाणी पसरून रस्ता चिखलमय झाला आहे. हजारो लिटर पाण्याचा अपव्यय सुरू आहे. असे येथील रहिवासी भूपेंद्र राऊत यांनी सांगितले आहे. याबाबत नगर परिषदेला विचारले असता पाणी गळतीची तात्काळ पाहणी करुन पाणी गळती थांबवण्यास सांगण्यात आले आहे.  यासाठी  दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या जातील असेही नगर परिषदेने म्हटले आहे.

farmer near chakan planted 66 cannabis plants in corn field
पिंपरी : चाकणमध्ये मक्याच्या शेतात गांजा
Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली