रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा: गेल्या चार दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने आज शनिवारी पहाटेपासून रुद्र रुप धारण केले आहे. जिल्ह्यातील सूर्या, पिंजाळी, देहेर्जा, वैतरणा, गारगाई या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. देहेर्जा नदीवरील ब्रामणगांव येथील पुल पाण्याखाली गेल्याने कंचाड- कुंर्झे या मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे. गारगाई नदीवरील शिलोत्तर येथील पुल पाण्याखाली गेल्याने पीक- गारगांव या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे.

wild elephant created havoc in the district gadchiroli three women seriously injured in attack
रानटी हत्तीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू ; दोघी गंभीर
Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर

वाडा- विक्रमगड या दोन तालुक्यांना जोडणारा कंचाड- कुर्झे हा एक महत्त्वाचा जिल्हामार्ग आहे. या मार्गावर देहेर्जा नदीवर ब्राम्हणगांव- कुंर्झे या दोन गावांच्या दरम्यान पुल आहे. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीत नेहेमीच हा पुल पाण्याखाली जातो. काही वेळा या भागातील नागरीकांचा चार, चार दिवस तालुक्यांशी संपर्क तुटतो. या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर शेलार यांनी पालघरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. गारगाई नदीला आलेल्या महापुरात शिलोत्तर येथील पुल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील बससेवा व अन्य वाहतूक ठप्प झाली आहे.

आणखी वाचा-अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळी दहा वाजेपर्यंत हा पुल पाण्याखाली गेलेला नव्हता, त्यामुळे आंबेपाडा, चिंचपाडा येथील विद्यार्थी, एसटी बसने तालुका मुख्यालयी असलेल्या शाळा, महाविद्यालयात गेले होते. मात्र सकाळी ११ वाजेनंतर हा पुल पाण्याखाली गेला. दुपारी दोन वाजेपर्यंत नदीचा पूर कायम राहिल्याने व पाण्याखालीच राहिल्याने येथील विद्यार्थी, नागरिक व शेकडो वाहने यांना ५ ते ६ तास नदीकाठी ताटकळत रहावे लागले होते.