डहाणू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानीवरी गावच्या हद्दीत आज दुपारी (५ जानेवार) दुपारी झालेल्या प्रवासी वाहनाच्या भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाप्रमाणेच वाहनाच्या मागच्या आसनावर बसणाऱ्या या प्रवाशांनी सीट बेल्ट घातला नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे.

डहाणू तालुक्यातून कडून गुजरात कडे दुपारी एक वाजल्याच्या सुमारास निघालेल्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन रस्त्याच्या खाली उतरून कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळले. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे वाहन खड्ड्यात पडल्यानंतर २ ते ३ वेळा उलटून ५० मिटर लांब फेकले गेले आहे.

हेही वाचा >>> समृद्ध गावांसाठी खोमारपाडा प्रारूप; योजनांच्या मदतीने पालघर जिल्ह्यातील गावाचा सर्वांगीण विकास

अपघाता दरम्यान वाहनाच्या पुढच्या बाजूला बसलेल्या पती-पत्नीने सीट बेल्ट लावल्याने ते जखमी झाले असून वाहनाच्या मागच्या आसनावर बसलेले व्याही (पती व पत्नी यांचे वडील) रमलाबेन आरीवाला आणि अमृतलाल घिवाला या दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालक व त्याची पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीला डबल डेकर डब्यांचा ४ जानेवारी अखेरचा दिवस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायरस मिस्त्री यांच्याप्रमाणेच दोघांचे अपघाती निधन ४ सप्टेंबर २०२२ रोजी एका आलिशान गाडीमधून गुजरात येथून मुंबईकडे परतताना सायरस मिस्त्री यांच्या वाहना ने चारोटी जवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला जोरदार धडक दिली होती. या अपघात समयी गाडीमध्ये मागच्या आसनावर बसलेल्या सायरस मिस्त्री व जहांगीर पांडोल हे अपघाता दरम्यान आपटले गेल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला होता.