Jairam Ramesh On Opposition Alliance: लोकसभा निवडणूक-२०२४ मध्ये भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांचे सर्वप्रकारे प्रयत्न सुरू आहेत. विविध कार्यक्रम राबवले जात आहे, विरोधकांची एकजुट करण्यासाठी अनेक दिग्गज नेते प्रयत्नशील आहेत. मात्र अद्यापपर्यंत विरोधकांच्या एकजुटीच्यादृष्टीने ठोस आणि सकारात्मक अशी घडमोड घडताना दिसलेली नाही. याच दरम्यान आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक विधान केलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला टक्कर द्यायची असेल तर काँग्रेसला विरोधी पक्षांच्या आघाडीचा आधार झालं पाहिजे, काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी अर्थपूर्ण ठरू शकत नाही. असं ते म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचबरोबर जयराम रमेश यांनी म्हटले की, भाजपाला पराभूत करण्यासाठी कोणतीही विरोधी आघाडी दोन वास्तविकतांवर आधारित असायला हवी. पहिली काँग्रेस कोणत्याही विरोधी आघाडीचा आधार असायला हवा आणि दुसरी कोणतीही विरोधी आघाडी रचनात्मक धोरणावर आधारित असायला हवी, केवळ भाजपाविरोधी आणि सरकारविरोधी धोरणावर नाही. ती केवळ एक सकारात्मक, रचानात्मक धोरणावर आधारित असली पाहिजे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Any opposition alliance makes sense when the congress jairam ramesh indicative statement msr
First published on: 29-01-2023 at 19:44 IST