संतोष प्रधान

अजित पवार व सुनील तटकरे यांचे घनिष्ठ संबंध वगळता प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील वा हसन मुश्रीफ या पहिल्या फळीतील नेत्यांचे अजितदादांशी कधीच फारसे सख्य नव्हते. पण भाजपबरोबर घरोबा करण्याकरिता या साऱ्या नेत्यांनी अजित पवारांशी जुळवून घेतले. हे सारे सत्तेसाठी वा केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्याकरिताच असावे, असे चित्र दिसत आहे.

Ajit Pawar lashed out at NCP workers says will not tolerate violence
मावळ : दगाफटका सहन करणार नाही, अजितदादांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ठणकावले, “मी एकदा…”
AJit Pawar vs Supriya Sule
“मी त्यांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी कारकीर्द…”
Chief Minister Eknath Shindes taunts to Naresh Mhaske attempt to comfort BJP leaders
मुख्यमंत्र्यांच्या नरेश म्हस्केंना कानपिचक्या, भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
dispute between mahayuti is not solved in Nandurbar Shinde group still away from campaigning
नंदुरबारमध्ये महायुतीतील वाद मिटेनात, शिंदे गट अजूनही प्रचारापासून दूर
What Abu Azmi Said?
अबू आझमींचं पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उत्तर, म्हणाले; “होय मी नाराज आहे”
nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात

राष्ट्रवादीच्या चौकटीत पक्षाध्यक्ष शरद पवार हे सर्व नेत्यांशी संवाद साधत असत. निर्णय प्रक्रियेत नेतेमंडळींना सामील करून घेत. पवारांनी सर्व तरुण नेत्यांना १९९९ मध्ये लोकशाही आघाडी सरकारच्या काळात प्रोत्साहन दिले व महत्त्वाची मंत्रिपदे दिली. अजित पवार हे सुरुवातीपासूनच नेतेमंडळींशी फटकून वागत असत. सुनील तटकरे वगळता पहिल्या फळीतील कोणत्याच नेत्यांशी त्यांचे फारसे सख्य नव्हते.

हेही वाचा… नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेची अधिक अडचण

प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात. यूपीए सरकारच्या काळात पटेल हे पवारांच्या सावलीसारखे असत. पण पटेल आणि अजित पवार यांच्यात कधीच फारसे सख्य नव्हते. याउलट एक-दोन बैठकांमध्ये या दोन नेत्यांमध्ये खटके उडाल्याचे सांगितले जाते. २००९च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा मतदारसंघातून प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंडखोरी केली होती. तेव्हा राष्ट्रवादीतूनच पटोले यांना रसद पुरविल्याची चर्चा होती. पटेल यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याकरिता पटोले यांच्या प्रचारार्थ एम. एच. १२ व एम.एच. १४ नोंदणीच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये नोंदणी झालेलेल्या गाड्या कोणी पाठविल्या, असा सवाल तेव्हा करण्यात आला होता. स्थानिक पातळीवर त्याची चर्चाही झाली होती.

हेही वाचा… सोलापूरमध्ये अजित पवार यांनाच अधिक पाठबळ

छगन भुजबळ व अजित पवार यांचेही कधीच फारसे सख्य नव्हते. भुजबळांवर तेलगी घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा राष्ट्रवादीच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचा मुद्दा अजित पवारांनीच उपस्थित केला होता, असे तेव्हा प्रसिद्ध झाले होते. २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आपल्याला डावलून भुजबळांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर अजित पवार संतप्त होऊन पक्षाच्या मुख्यालयातून तडक निघून गेले होते.

हेही वाचा… धर्मरावबाबांच्या मंत्रीपदामुळे भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता !

पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांचेही फारसे जमले नाही. वळसे-पाटील हे पूर्वी शरद पवार यांचे स्वीय सचिव होते. वळसे-पाटील यांच्या मतदारसंघात अजित पवार यांनी वळसे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने तेव्हा चर्चाही झाली होती. २००९ मध्ये मंत्रिपदाऐवजी विधानसभा अध्यक्षपद स्वीकारावे लागेल यामागे अजित पवार असल्याचा समज वळसे-पाटील यांचा झाला होता. हसन मुश्रीफ हे कायमच शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. यामुळेच तटकरे वगळता राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील एकाही नेत्याचे अजित पवार यांच्याशी फारसे सख्य नव्हते.

ही वस्तुस्थिती असली तरी भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी ही सारी नेतेमंडळी अजित पवार यांच्याबरोबर संघटित झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. सत्तेची हाव किंवा ईडी वा अन्य केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्याकरिताच हे सारे एकत्र आले असावेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.