Sexual Exploitation case against Chandrashekhar Azad भीम आर्मीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशमधील नगीना मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीएचडी स्कॉलर महिलेच्या तक्रारीनंतर सोमवारी राष्ट्रीय महिला आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिलेने आपल्या ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. लवकरच सत्य समोर येईल. मी माझ्या स्वाभिमान आणि प्रतिष्ठेसाठी लढेन. मी मागे हटणार नाही,” असे तिने लिहिले आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? महिलेने तक्रार दाखल करताना नक्की काय म्हटले आहे? कोण आहे चंद्रशेखर आझाद? जाणून घेऊयात.

भीम आर्मीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशमधील नगीना मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीएचडी स्कॉलर महिलेच्या तक्रारीनंतर सोमवारी राष्ट्रीय महिला आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिलेने आपल्या ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. लवकरच सत्य समोर येईल. मी माझ्या स्वाभिमान आणि प्रतिष्ठेसाठी लढेन. मी मागे हटणार नाही,” असे तिने लिहिले आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? महिलेने तक्रार दाखल करताना नक्की काय म्हटले आहे? कोण आहे चंद्रशेखर आझाद? जाणून घेऊयात.

प्रकरण काय?

  • तक्रारदार महिला ही इंदूरमधील बिमा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका सफाई कामगाराची मुलगी आहे.
  • ती २०१९ मध्ये उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेली होती.
  • तिने सांगितले की, शिक्षण सुरू असतानाच ती चंद्रशेखर आझाद यांच्या संपर्कात आली आणि ते दोघे तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते.
  • तिने आपल्या तक्रारीत म्हटले, “२०२१ पासून आम्ही संपर्कात होतो. या काळात चंद्रशेखर यांनी मला आश्वासन दिले की ते अविवाहित आहेत आणि लग्नासाठी माझ्यासारख्याच व्यक्तीच्या शोधात आहेत. त्यांनी मला लग्नाचे आश्वासन देऊन माझ्याशी भावनिक संबंध निर्माण केले. त्यांच्या आश्वासनानंतर मी त्यांना पूर्णपणे स्वीकारले आणि त्यांच्या राजकीय प्रचारातदेखील त्यांना पाठिंबा दिला.”
चंदशेखर आझाद यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील एका गावात झाला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

ती पुढे म्हणाली, “जेव्हा मी भारतात आले, विशेषतः दिल्लीत आले तेव्हा चंद्रशेखर यांनी मला अनेक वेळा द्वारका येथील एका हॉटेलमध्ये आणि त्यांच्या निवासस्थानी फोन करून बोलावले. त्यांनी माझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगून शारीरिक संबंध ठेवले. मला ते सुरुवातीपासूनच अविवाहित असल्याचे सांगून सतत फसवत होते. लग्नाच्या खोट्या आश्वासनाखाली त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले,” असे महिलेने तिच्या तक्रारीत लिहिले आहे. ‘एक्स’वरील अनेक पोस्टमध्ये महिलेने खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “त्यांना बहिणी आणि मुलींच्या सन्मानाची किंमत नाही. मी त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठी चूक केली. आता मी कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवू शकणार नाही,” असे या महिलेने लिहिले. तिने असाही दावा केला की, तिचे भावनिक शोषण करण्यात आले आणि नंतर तिला सोडून देण्यात आले.

चंद्रशेखर आझाद कोण आहेत?

२०१४ साली चंद्रशेखर आझाद यांनी दलित हक्कांसाठी समर्पित भीम आर्मी या संघटनेची स्थापना केली. दलित आणि उपेक्षितांच्या न्याय हक्कांसाठी लढण्याचा उद्देश समोर ठेवून या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. मे २०१७ मध्ये उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे ठाकूर आणि दलितांमध्ये मोठा संघर्ष झाला. या संघर्षादरम्यान चंद्रशेखर आझाद प्रकाशझोतात आले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. डिसेंबर २०१९ मध्ये दिल्लीत नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी आझाद यांना अटक केली. त्यांनी या मोर्चात जामा मशिदीच्या पायऱ्यांवरून निदर्शकांना संबोधित केले होते, ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

जानेवारी २०२० मध्ये दिल्लीच्या एका न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मार्च २०२० मध्ये चंद्रशेखर आझाद यांनी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त आझाद समाज पक्षाची स्थापना केली. अनेकदा आझाद यांनी दलित समुदायांच्या हक्काचा मुद्दा घेऊन बहुजन समाज पक्षप्रमुख मायावती यांच्यावर टीका केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आझाद यांनी उत्तर प्रदेशातील नगीना मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे ओम कुमार यांचा १,५१,४७३ मतांनी पराभव केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंदशेखर आझाद यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील एका गावात झाला आहे. सुरुवातीला ते स्वत:ला चंद्रशेखर आझाद ‘रावण’ म्हणायचे. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी स्वत:च्या नावापुढील रावण हा शब्द काढून टाकला. ‘माझ्या नावाचा वापर करून विरोधकांनी ‘तुम्हाला राम हवे आहेत की रावण’ अशी टीका करू नये, म्हणूनच मी रावण हा शब्द काढला,’ असे चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले होते.